Saturday, December 31, 2016

लडकतवाडी पुनर्वसन योजनेचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते भूमिपूजन

    
            पुणे, दि. 31– झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत विकसीत करण्यात येणाऱ्या  लडकतवाडी पुनर्वसन योजनेचे भूमिपूजन आज पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक सर्वश्री विनायक हनमघर, धनंजय जाधव उपस्थित होते.
            लडकतवाडी येथे विकसित करण्यात येणाऱ्या या गृहनिर्माण योजनेद्वारे 56 कुटूबियांना हक्काचे घर मिळणार आहे. विकसीत करण्यात येणारी इमारत आठ मजली असून या इमारतीमध्ये रहिवाशांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोई सुविधा पुरविण्यात येणार आहेत. रहिवाशांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी या इमारतीमध्ये व्यावसायिक आस्थापनांना गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
            यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, कमी उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनांना राज्यशासन सर्वप्रकारच्या सवलती देत आहे. झेापडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये शासन लवकरच नागरिकांसाठी हितकारक बदल करण्यात येणार आहेत. नवीन गृहनिर्माण योजनांसाठी विकसकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. अशाप्रकारच्या योजनांमुळे शहरे झेापडपट्टीमुक्त होतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिंधीनी झेापडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
            आमदार माधुरी मिसाळ यांनी झेापडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये विकसकांनी सौर उर्जेवर चालणारी उपकरणे बसविण्याची सूचना केली. सौरउर्जेवर चालणारी उपकरणे बसविल्यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा इमारतीचा देखभाल व दुरुस्तीवरील खर्च वाचणार असल्याचे त्या म्हणाल्या.
            कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
           
00000


पालखी मार्गावर वारक-यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा देणार - विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम


 पंढरपूर दि. 31 :- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देऊन पालखी तळ व पालखी मार्गावरील कामे आषाढीपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. देहु- आळंदी पासून पंढरपूरात येणा-या सर्व पालखी मार्गांचा विकास करुन याठिकाणी वारक-यांसाठी आवश्यक असणा-या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, तहसीलदार नागेश पाटील, जिल्हा नियेाजन अधिकारी सर्जेराव दराडे, कार्यकारी अभियंता एस.टी. राऊत, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपअभियंता श्री. गावडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सतीश सूर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त यांनी बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि सर्व संबंधित अधिका-यांना योग्य त्या सूचना केल्या यावेळी ते म्हणाले तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे दर्जेदार गुणवत्ता पूर्ण व मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
पंढरपूर शहरात सुरु असलेली 3 रस्त्यांची कामे, 65 एकर येथील उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. वारक-यांना सुविधा देण्यासाठी 65 एकर जागा विकसित करण्यात आली आहे. याठिकाणी आणखी रेल्वेची 15 एकर जागा उपलब्ध होणार आहे. या 15 एकर जागेच्या मोबदल्यात रेल्वे प्रशासनाला राज्य शासनाने रायगड येथे जमीन हस्तांतरित केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून पंढरपूर येथील 15 एकर जागेचे हस्तांतरणाचे आदेश लवकरच प्राप्त होतील. ही जागा प्रशासनाकडे हस्तांतरीत झाल्यांनतर या जागेचाही विकास करुन वारक-यांना पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत.
विभागीय आयुक्त म्हणाले, वाखरी येथील पालखी तळाची जागा अपुरी पडत असून याठिकाणी आणखी जागा उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या जागेवरही              वारक-यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. पालखी तळ आणि पालखी मार्गावर वारक-यांसाठी वीज- पाणी, स्नानाची व्यवस्था, शौचालय व्यवस्था देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी वाखरी पालखी तळ, गजानन महाराज मठ येथे सुरु असलेल्या रस्त्याचे काम आणि 65 एकर येथील कामाची पहाणी करुन संबंधित अधिका-यांना योग्य त्या सूचना दिल्या.





Friday, December 30, 2016

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात समन्वय समितीच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सूचना


            पुणेदि30 पेरणेफाटा, ता.हवेली येथील विजयस्तंभास 1 जानेवारी रोजी मोठया प्रमाणावर नागरिक अभिवादन करण्यासाठी येतात. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सर्व प्रकारच्या सुविधा पुरव्याव्यात, अशी सूचना पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे समन्वय समितीच्या बैठकीत दिल्या.
            पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, हवेली उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, विविध विभागांचे अधिकारी, आयोजन समितीचे पदाधिकारी सर्वश्री परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, संजय सोनावणे, महेश शिंदे, डॉ.सिध्दार्थ धेंडे, महिपाल वाघमारे, बाबुराव दहाडगे उपस्थित होते.
            पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी विजयस्तंभास भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, वाहनाच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, ॲम्बुलन्स, अग्नीशमन दलाची वाहने, परिसराची साफसफाई करुन घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विक्रेत्यांनी अतिक्रमण करु नये, हॉटेल आणि अन्न पदार्थांच्या विक्रीच्या स्टॉलची तपासणी करा होमगार्डची संख्या वाढवा इत्यादी उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. संयोजन समितीचे पदाधिकारी यांनी प्रशासनाशी ताळमेळ ठेवून मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
            विजयस्तंभास भेट देण्यासाठी राज्यातून मोठया प्रमाणावर नागरिक येतात. यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांची नियमित बैठक घेण्यात यावी, असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीस जिल्हयातील प्रांताधिकारी, तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम, विद्युत वितरण, आरोग्य विभाग, महानगरपालिकांचे अधिकारी, विजयस्तंभ अभिवादन समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
000000

Thursday, December 29, 2016

मांजरी नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांच्याहस्ते भूमिपूजन


            पुणे, दि. 29मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मांजरी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार योगेश टिळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
            सुमारे 42 कोटी रुपये खर्च करुन ही पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे परिसरातील नागरिकांची 14.65 ..लि.पाण्याची दैनंदिन गरज भागणार असून यामुळे मांजरी व परीसरातील गावांना या योजनेमुळे शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. या पाणी पुरवठा योजनेला खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मांजरी गावठाण, महादेव नगर व स्टडफार्म येथे पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत.
            या योजनेच्या भूमिपूजनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, पाणी पुरवठा योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच दोन वर्षात ही योजना पूर्ण होईल असे सांगितले. राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे तसेच घनकचऱ्यावर प्रक्रिया करुन तो नष्ट करणे, मलनिस्सारण योजना राबविणे यावर लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
            आमदार योगेश टिळेकर यांनी या पाणी पुरवठा योजनेमुळे मांजरी परिसरातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल असे सांगितले. मांजरी परिसराच्या विकासाच्या विविध योजनांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे ते म्हणाले.
            या कार्यक्रमास परिसरातील ग्राम पंचायत व पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
           



000


Monday, December 26, 2016

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानासाठी योग्य नियोजन करावे -- राजेंद्र मुठे

 नऊ जानेवारी पासून अभियानाचे आयोजन  

 पुणे, दि. 26 : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिल्या.
श्री. मुठे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झालीयावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी पोलीस उपआयुक्त(वाहतुक) प्रविण मुंढे, पोलीस अधीक्ष्क (द्रुतगती मार्ग ) अमोल तांबे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत   जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.
श्री. मुठे म्हणाले, दिनांक 9 ते 24 जानेवारी 2017 या कालावधीत 28 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात  येणार  आहे. रस्ते अपघातांची गंभीर समस्या रस्ता सुरक्षेबाबत जनतेची बांधिलकी या अनुषंगाने जनजागरण प्रबोधन करुन या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना  सहभागी करुन अभियानाची व्याप्ती वाढवावी. या अनुषंगाने या बैठकीमध्ये विविध  विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच संबंधीत विभागांना त्याबाबत अंमलबजावणीच्या  सुचना देण्यात आल्या.
हे अभियान परिवहन विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,राज्य परिवहन महामंडळ, पीएमपीएमएल, शिक्षण विभाग, सेवाभावी संस्था वाहतुकदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहेरस्ता सुरक्षा पंधवड्याचे आयोजन अंमलबजावणी, जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्राचा आढावा घेऊन उपाययोजना करणे. द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी होण्यासाठी करावयाची उपाययोजना, सुरक्षित शालेय विद्यार्थी  वाहतुकीस प्रोत्साहन देणे नियमावलीची अंमलबजावणी करणे, अवैध प्रवासी  वाहतुकीविरुध्द कारवाई, विविध उपक्रमांद्वारे समाज प्रबोधन,जनजागृती विशेष मोहिमांचे आयोजन करणे, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, रोड सेफ्टी ऑडीट, साईन बोर्ड माहितीचे बोर्ड लावणे, झेब्रा क्रॉसिंग इतर पटेट् रंगविणे, धोकादायक जाहिराती फलक काढणे आदी उपक्रम या कालावधीत घेण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याकरिता त्यांच्यासाठी  विविध स्पर्धा,व्याख्याने परिसंवादाचे आयोजन, वाहन चालकांची आरोग्य तपासणी,नेत्रतपासणी, गोल्डन अवर्स चे महत्त्व प्रथमोपचाराबाबत जनजागृती , अपघातांबाबत सेवाभावी संस्था विविध संस्थांच्या सहकार्याने अभियान राबविण्यात येणार आहे.   
000000


आदिवासी आदान- प्रदान महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य -- जिल्हाधिकारी सौरभ राव


जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न
                                  
         पुणेदि.26 : आदिवासी आदान-प्रदान महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. हा महोत्सव केवळ सांस्कृतिक आदान प्रदानापुरता मर्यादित न राहता  आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगार निर्मितीबाबत माहिती पोहोचविण्याबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्यात उपयुक्त ठरेल,असा विश्वास जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केला.
नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला नेहरू युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते तथा समिती सदस्य सर्वश्री डॉ.मिलिंद भोई, हितेंद्र सोमाणी डॉ. शंतनू जगदाळे, प्रवीण निकम,डॉ.अन्वर शेख, रामदास मारणे, सदस्य दिगंबर माने, रसिका कुलकर्णी व अन्य सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. राव यांनी नेहरु युवा केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा तसेच पुण्यात या महोत्सवांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. या महोत्सवादरम्यान आदिवासी युवकांसाठी विविध क्षेत्रातील तज्ञाशी सुसंवाद कार्यक्रम, विविध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना भेटी, आयुका तसेच नामवंत शिक्षण संस्थांना भेटी आदी बाबींचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मानखेडकर यांनी दिली. या महोत्सवाची माहिती अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना डॉ. भोई यांनी यावेळी  केली.
                                        
                                      00000

Saturday, December 24, 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीकडे प्रयाण




पुणेदि. २४ (वि.मा.का.): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानाने लोहगाव विमानतळावरून रात्री ८. ५० वाजता दिल्लीकडे प्रयाण झाले. 
         श्री. मोदी यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेच केंद्रीय नगरविकास व माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडूकेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरपुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापटआमदार जगदीश मुळीकराज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रियलष्कराचे ले. जनरल पी. एम. हरतीजएअर कमांडर ए. के. भारतीविभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगमपोलीस आयुक्त रश्मी शुक्लाजिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही श्री. मोदी यांना निरोप दिला.
00000