Saturday, July 30, 2016

पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तीक लाभाच्या योजना


    सातारा दि.30 (जि.मा.का.):जिल्हा परिषद सातारा , पशुसंवर्धन  विभागामार्फत  पशुपालकांसाठी  वैयक्तीक  लाभाच्या  विविध  योजना  राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.विनोद पवार यांनी केले आहे.
             योजनांची  माहिती व  लाभार्थी निवडीचे  निकष  पुढीलप्रमाणे- विशेष  घटक योजना  सन २०१६-१७   अनु .  जाती  व नवबौध्द लाभार्थीना  ७५  टक्के अनुदानावर  दुधाळ  जनावरांचे  गट  वाटप  (प्रत्येकी २ गाई अथवा  म्हैशीचे  वाटप ), अनु. जाती व नवबौध्द  लाभार्थीना  ७५  टक्के  अनुदानावर शेळी गट वाटप ( १० शेळ्या  + १  बोकड )अनु . जाती  व नवबौध्द  लाभार्थी कडील  जनावरांना   भाकड  कालावधीसाठी  १००  टक्के  अनुदानावर खाघ वाटप  योजना.                            
            या योजनांसाठी  लाभार्थीनी   करावयाच्या  अर्जाचा  नमुना  पशुधन अधिकारी  विस्तार, पंचायत समिती  यांचेकडे  उपलब्ध  असून  त्यासोबत   लाभार्थीनी  स्वत: चे  फोटो  व  ओळखपत्राची  सत्य प्रत, जातीचा दाखला ,  दारिदयरेषेखाली  असल्यास  क्रमांक व  गुणांसह दाखला, शासकीय  सेवेत  नसल्याबाबतचा तसेच  १ मे २००१ पुर्वी  ३ रे अपत्ये  नसलेबाबतचा   ग्रामसेवकाचा  दाखला, जमिनीचा  खाते उतारा, शेतमजूर  असल्यास  दाखला , लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी  बॅकेचे  प्रमाणपत्र  अथवा  स्वत:चे  हमीपत्र खाघ वाटप व प्रशिक्षण योजनेसाठी ग्रामपंचायतीचा  ठराव प्रत, पशुधन अधिकारी  विस्तार, पंचायत समिती यांची शिफारस इत्यादी  कागदपत्रे सादर  करणे आवश्यक आहे.      
            विशेष  घटक  योजने अंतर्गत दुधाळ  जनावरांचे  गट  वाटप  योजना  (२ गाई किंवा २ म्हशी ) व शेळी गट  वाटप  योजना  (१० शेळ्या + १ बोकड ) या योजनांसाठी  पात्र   लाभार्थीनी   दि . २० ऑगस्ट २०१६   पर्यत नजिकच्या  पशुवैघकीय  दवाखान्यांमार्फत   पंचायत  समितीकडील  पशुसंवर्धन  विभागाकडे  अर्ज सादर  करावेत, असेही डॉ.पवार यांनी कळविले आहे.
00000

1 ते 15 ऑगस्ट पशुधन विमा पंधरवडा -डॉ.विनोद पवार


          सातारा दि.30 (जि.मा.का.):शासनाच्या पशुधन विमा योजनेतून पशुधन विमा उतरविणेसाठी जिल्हयात 1 ते 15 ऑगस्ट,2016 या दरम्यान पशुधन विमा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधुन सदर योजनेचा लाभ घ्यावा पल्या बहुमूल्य पशुधनास विमा कवच द्यावे असे, आवाहन पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.
शासनाच्या वतीने पशुधनासाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. याकरिता दारिद्रय रेषेखालील तसेच अनुसूचीत जाती-जमातीतील पशुपालकांसाठी विम्याच्या रकमेत 70 टक्के तर इतरांना 50 टक्के सवलत मिळणार आहे. जनावरांची किंमत ही त्यांच्या रोजच्या दुधावरुन ठरविण्यात येणार आहे. गाईची किंमत ठरविताना दुधाचा दर प्रती लिटर 3000 तर म्हशीची किंमत ठरविताना दुधाचा दर प्रती लिटर 4000 धरण्यायेणार आहे. जनावरांच्या किंमतीच्या 2.45 टक्के रक्कम भरल्यास एक वर्षाचा तर किंमतीच्या 6.40 टक्के रक्कम भरुन तीन वर्षाचा विमा उतरविता येणार आहे.
विम्यासाठी केंद्रशासन अनुदान देणार आहे. न्यु इंडिया इन्शूरन्स कंपनीकडे विमा रक्कम भरावयाची असून जिल्हयात एकूण 130338 पशुधन असून त्यामध्ये शेळी 309011, मेंढी 264221, गायवर्गीय 377262 म्हैसवर्गीय 352844 यांचा समावेश आहे. प्रत्येक लाभार्थीला पाच मोठया जनावरांचा विमा उतरविता येईल. जिल्हयात एकूण 193 पशुवैद्यकिय दवाखाने असून त्यांना 5000 जनावरांचा विमा उतरविण्याचे उद्दिष्ट देणेत आलेले आहे, असेही डॉ.विनोद पवार यांनी कळविले आहे.
00000


आत्मामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनातंर्गत प्रशिक्षण


            सातारा दि.30 (जि.मा.का.):मौजे कुसवडे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत आले पीक परिसंवाद व पाणी व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न झाले.
            या प्रशिक्षणास आत्माचे कृषी उपसंचालक विकास बंडगर, मंडल कृषी अधिकारी अजिंक्य पवार, कृषी पर्यवेक्षक अर्जुन पवार, कृषी सहाय्यक अंकुश सोनावले, नितीन जाधव, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश नलवडे, सुप्रिया जाधव व कुसवडे आदी उपस्थित होते.
            या कार्यक्रमामध्ये आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. बंडगर यांनी आत्मा मध्ये कोणकोणते नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात आले याची सविस्तर माहिती दिली. शेतक-यांना नाविन्यपूर्ण प्रशिक्षणाची गरज असल्यास किंवा अभ्यास दौरा आयोजीत करावयाचा असल्यास त्यांचे नियोजन आत्मा मार्फत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
            कृषी सहाय्यक  श्री. सेानावले यांनी आले पिकावरील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. आले किड व रोग नियत्रंणासाठी कंदमाशी ,कंदकुज एकात्मिक पध्दतीने कशी नियत्रंण करणे त्यांचे मार्गदर्शन केले. कंदकुज नियत्रंणसाठी सुडोमोनोस, हुमणी,कंदमाशी अळी यांच्या नियत्रंणासाठी मेटोरायझिंयम, पानाच्या करपा नियत्रंणासाठी गोमूत्र लसुण अर्क फवारणी, कडुलिंब अर्क, कंदमाशी नियत्रंणासाठी पिवळे चिकट सापळे, फळमाशी सापळे वापरणे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नितीन जाधव यांनी ठिंबक सिंचन देखभाल कशी करावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ठिंबक कोणते बसवावे, तसेच विद्राव्य खताविषयी माहिती दिली.
            कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक. गणेश नलवडे यांनी केले. तर आभार आनंदराव महाडीक यांनी मानले. यावेळी कृषी अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

00000

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नावे नोंदवावित - राज्य निवडणूक आयुक्त


 
            मुंबईदि. 30 : राज्यात डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 195 व 19 नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत किंवा मतदार यादीत आपल्याशी संबंधित तपशिलांत दुरुस्त्या असल्यास त्या कराव्यातअसे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केले.
            श्री. सहारिया यांनी सांगितले कीविधानसभा मतदारसंघाची मतदार यादी भारत निवडणूक आयोगातर्फे तयार केली जाते. तीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी 10 सप्टेंबर 2016 रोजी अस्तित्त्वात येणारी विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2016 रोजी किंवा तत्पूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. तरच त्यांना नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करता येईलतसेच यापूर्वीच मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतील तपशिलात बदल असल्यास त्यासाठीदेखील अर्ज करता येईल. त्याचबरोबर दुबार नावे,स्थलांतरितांची नावे अथवा मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठीसुद्धा अर्ज करता येईल. त्यासाठीच्या अर्जांचे नमुने मतदार नोंदणी केंद्रतसेच मुख्य निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
            मतदार नोंदणीचा विषय भारत निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतला असला तरी कुठलीही पात्र व्यक्ती नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहू नये याकरिता राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या भारत निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम (NERP) राबविला जात आहे. त्याचे औचित्य साधून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकारीतसेच नगरपरिषद व नगरपंचायतींना दिले आहेत. त्याचबरोबर सर्व स्तरांवर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणेआपापल्या क्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्राचाऱ्यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्येच मतदार नोंदणी अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करणेतसेच नागरिकांसाठी नगरपरिषदनगरपंचायतींच्या क्षेत्रांत आवश्यक तेवढे मतदार अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
            नोव्हेंबर- डिसेंबर 2016 मध्ये निवडणूक होणाऱ्या जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींची नावे:  रायगड- उरणपनवेलखोपोलीपेण,अलिबागमुरुड-जंजिरारोहाश्रीवर्धनमहाडमाथेरान गिरीस्थान. रत्नागिरी- दापोली न.पं.खेडचिपळूणरत्नागिरीराजापूर. सिंधूदूर्ग- वेंगुर्लासावंतवाडी,मालवणदेवगड- जामसांडे न.प. (नवनिर्मित). पालघर- विक्रमगड न.पं. (नवनिर्मित)मोखाडा न.पं. (नवनिर्मित)तलासरी न.पं. (नवनिर्मित). पुणे- जुन्नरतळेगाव-दाभाडेलोणावळाशिरुरआळंदीदौंडसासवडजेजुरी,इंदापूरबारामती. सांगली- आष्टाविटातासगावइस्लामपूरपलूस नगरपरिषद (नवनिर्मित)कवठे-महाकाळ न.पं. (नवनिर्मित)कडेगाव न.पं. (नवनिर्मित)खानापूर न.पं. (नवनिर्मित)शिराळा न.पं. (नवनिर्मित).  सातारा- वाईफलटणम्हसवडरहिमतपूरकराडसातारामहाबळेश्वर गिरीस्थान,पाचगणी गिरीस्थानकोरेगाव न.पं. (नवनिर्मित)मेढा न.पं. (नवनिर्मित)पाटण न.पं. (नवनिर्मित)वडूज न.पं. (नवनिर्मित)खंडाळा न.पं. (नवनिर्मित),दहिवडी न.पं. (नवनिर्मित). सोलापूर- करमाळाकुर्डूवाडीबार्शीपंढरपूर,सांगोलामंगळवेढेअक्कलकोटदुधनीमैंदर्गी. कोल्हापूर- वडगाव,इचलकरंजीजयसिंगपूरकुरुंदवाडकागलमुरगुडगडहिंग्लजपन्हाळा गिरीस्थानमलकापूर. नाशिक- सटाणानांदगावमनमाडभगूरसिन्नर,येवला. अहमदनगर- कोपरगावशिर्डी न.प.राहताश्रीरामपूरराहुरीदेवळी-प्रवरासंगमनेरपाथर्डी. धुळे- शिरपूर-वरवडेदोंडाईचा-वरवडे. नंदूरबार-  शहादा. जळगाव- चोपडायावलफैजपूरसावदारावेरभुसावळएरंडोल,धरणगावअमळनेरपारोळाचाळीसगावपाचोराबोदवड न.पं. (नवनिर्मित). औरंगाबाद-  कन्नडवैजापूरगंगापूरपैठणखुलाताबाद. जालना- भोकरदन,जालनाअंबडपरतूर. परभणी- मानवतपाथरीसोनपेठगंगाखेडपूर्णासेलू,जिंतूर. नांदेड- माहूर नगरपंचायतअर्धापूर नगरपंचायतउमरीधर्माबाद,हदगावमुदखेडकुंडलवाडीबिलोलीकंधारदेगलूरमुखेड. हिंगोली- हिंगोलीकळमनुरीबसमतनगर. बीड- गेवराईमाजलगावबीडकिल्लेधारुर,परळीआंबेजोगाई. लातूर- निलंगाउदगीरऔसाअहमदपूर. उस्मानाबाद- भूमकळंबनळदुर्गमुरुमउमरगापरांडाउस्मानाबादतुळजापूर.  अमरावती- अंजनगाव सुर्जीमोर्शीवरुडशेंदुरजना घाटचांदूररेल्वे,धामणगाव रेल्वेअचलपूरचांदूरबाजारदर्यापूर. अकोला- अकोटमूर्तिजापूर,तेल्हाराबाळापूरपातूर. बुलढाणा- जळगाव-जामोदशेगावनांदुरा,मलकापूरखामगावमेहकरचिखलीबुलढाणादेऊळगाव-राजा. वाशीम- कारंजावाशीममंगरुळपीर. यवतमाळ- यवतमाळदिग्रसपुसदउमरखेड,घाटंजीवणीआर्णीदारव्हा. नागपूर- नरखेडकळमेश्वरमोहपासावनेर,रामटेकउमरेडकामठी,  खापाकाटोल. वर्धा- देवळीआर्वीसिंदी रेल्वे,पुलगावहिंगणघाटवर्धा. भंडारा- पवनीभंडारातुमसरसाकोली नगरपरिषद (नवनिर्मित). गोंदिया- तिरोरागोंदिया. चंद्रपूर- मूलराजुराबल्लारपूरवरोरा,नागभिड नगरपरिषद, (नवनिर्मित) सिंदेवाही न पं (नवनिर्मित) गडचिरोली- देसाईगंजगडचिरोली.
 
• मतदार म्हणून नाव नोंदणे- नमुना क्र. 6

• मतदार यादीतील नाव वगळणे- नमुना क्र. 7

• नाव व अन्य तपशिलांत दुरुस्ती - नमुना क्र. 8

• मतदारसंघ अंतर्गत पत्ता बदलविणे- नमुना 8 अ

----०-०-०----

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याहस्ते शासकीय वसतिगृह इमारतीचे आज उदघाटन


पुणे, दि. 30–सामाजिक न्याय विशेष सहाय विभागार्फत शिरुर, जि. पुणे येथे 100 विद्यार्थिनी क्षमतेचे मुलींचे शासकिय वसतिगृह बांधण्यात येणार आहे. या वसतिगृहाच्या  इमारतीचा पायाभरणी  समारंभ सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग मंत्री श्री.राजकुमार बडोले यांच्याहस्ते पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरिश बापट यांचे अध्यक्षतेखाली 31 जुलै 2016 रोजी दुपारी 1-30 वाजता  होणार आहे. हा कार्यक्रम शिरुर-पुणे-अहमदनगर महामार्गालगत गोलेगाव रोड, शिरुर या ठिकाणी  आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग राज्यमंत्री दिलीप कांबळे राज्यमंत्री, खा.शिवाजीराव आढळराव पाटील मा..बाबुराव पाचर्णे, नगराध्यक्षा सौ.सुवर्णाताई लोळगे उपनगराध्यक्ष प्रकाशशेठ धारिवाल हे उपस्थित राहणार आहेत.
31 जुलैरोजी दुपारी 4-30 वा मोशी (पिंपरी चिंचवड),पुणे  येथे 250 विध्यार्थिनी क्षमतेचे मुलींच्या शासकिय वसतिगृह इमारतीचे उदघाटन सामाजीक न्याय विशेष सहाय विभाग मंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरिश बापट यांचे अध्यक्षतेखाली तसेच सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर शकुंतला धराडे, खा.अमर साबळे, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, . महेशदादा लांडगे, .लक्ष्मण जगताप, .गौतम चाबुकस्वार, उप महापौर प्रभाकर वाघेरे यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेला आहे. दोन्ही कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे अवाहन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

00000