Saturday, November 24, 2018









व्यापार - उद्योग वाढीत लाडशाखीय वाणी समाजाचे मोठे योगदान
-मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस
                                   -अखिल भारतीय महाआधिवेशनाचे थाटात उद्घाटन
                 - विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी जागा देणार
                 - ८० हजाराहून अधिक सभासदांची नोंदणी
                   - उद्योजकता मार्गदर्शन प्रदर्शनाचे २०० दालने

            पुणे  दि. 24-  देशाच्या व्यापार व उद्योग वाढीत लाडशाखीय वाणी समाजाचे मोठे योगदान आहे. हा समाज आता शिक्षणातही पुढे येत  आहे. पुणे शहर शिक्षणाचे माहेर घर असल्याने अनेक विद्यार्थी येथे येतात. या विद्यार्थांच्या निवासाची सोय होण्यासाठी 500 खोल्यांचे वसतिगृह बांधण्याचा मानस या समाजाचा आहे. त्यासाठी  पुणे व नाशिक शहरात जमीन उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
                        अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते .
    यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, स्वागताध्यक्ष आर.एल.वाणी,  कार्याध्यक्ष कैलाश वाणी आदी उपस्थित होते.
            आधिवेशनासाठी देशभरातून आलेल्या लोकांना शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, इतिहासात लाडशाखीय वाणी समाजाने प्रत्येक आक्रमणाचा समर्थपणे सामना केला आहे. जेव्हा देशाला गरज पडली तेव्हा  या समाजाने बलिदानही  दिले  आहे. या समाजाला  मोठा इतिहास आहे. देशातील व्यापार आणि उद्योगाची समृद्धी वाढविण्यामध्ये वाणी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे.
     मुख्यमंत्री श्री. फडणवीस  पुढे म्हणाले,  यशस्वी समाजामध्ये सरासरी 2 ते 3 टक्के लोक वाणी समाजाचे आहेत. लाडशाखीय वाणी समाज हा कर्मयोगी आहे.
       या कर्यक्रमात अनावरण झालेल्या लाडशाखीय वाणी  समाजाच्या चेंबर ऑफ कॉमर्सचा दर्जा जागतिक पातळीवरचा होईल, अशा शुभेच्छा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समाजाची माहिती देणाऱ्या समाजमंथन’’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्याध्यक्ष कैलाश वाणी यांनी या समाजाचा इतिहास सांगताना हा समाज विविध क्षेत्रात करीत असलेल्या प्रगतीची माहिती दिली. सध्या विविध क्षेत्रात समाजाचे असणारे प्रतिनिधित्वा बाबत देखील  लक्ष वेधले. समाजाकडून 20 ते 25 दुष्काळग्रस्त गावांना अन्न, वस्त्र, निवारा पुरवणार असल्याचेही  श्री. वाणी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधी साठी 11 लाख
 यावेळी लाडशाखीय वाणी समाजाकडून मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा लाख रुपयांचा धनादेश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आला.
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना देखील वाणी समाज दत्तक घेत असून या विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक सन्मान यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
००००

Friday, November 16, 2018

भूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा
महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. १६ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून साकारणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प हा भूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहत आहे. या प्रकल्पामुळे एक मोठे अर्थकारण उभे राहणार असून ग्रामस्थांच्या सकारात्मक सहभागामुळे ते विकासाच्या समृद्धीचे नवे मॉडेल म्हणून ओळखले जाईलअसा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
महाळुंगे-माण येथील हायटेक सिटीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यानंतर महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या वेट लिफ्टिंग सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापटजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकातेखासदार अनिल शिरोळेआमदार सर्वश्री. संग्राम थोपटेबाबुराव पाचर्णेमेधा कुलकर्णीविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्तेजिल्हाधिकारी नवलकिशोर रामजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरेमाणच्या सरपंच स्मिता भोसलेमहाळुंगेचे सरपंच मयूर भांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेहिंजेवाडी हे पुण्याचे ग्रोथ इंजिन आहे. त्याप्रमाणेच महाळुंगे-माण हाय टेक सिटी प्रकल्पाचे पुणे शहराच्या विकासात महात्वाचे योगदान राहणार आहे. या प्रकल्पामुळे पुण्यासह महाराष्ट्राचे नाव देशभरात होणार आहे.
मुंबई आणि परिसराचा विकास एमएमआरडीएच्या माध्यमातून झालात्याच धर्तीवर पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे परिसराचा विकास होणार आहे. पीएमआरडीएच्या विविध प्रकल्पांमधून पुण्याच्या नागरिकीकरणाला योग्य दिशा मिळणार आहे. यासाठी नागरी विकासासाठी जगभर प्रसिद्ध असणाऱ्या सिंगापूरच्या सरकारी कंपनीशी आपण करार केला आहे. पुढील ४० ते ५० वर्षांचा कालावधी विचारात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.
            पुण्याच्या नियोजनबध्द वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील ३२ किलोमीटरचे काम डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात येणार आहे. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रिंगरोड अत्यंत महत्वाचा आहे. रिंगरोडसाठी आवश्यक असणारी जमीन राज्य शासन अधिग्रहित करून देईल. केंद्र सरकार रिंगरोडचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहे. याच बरोबर पुरंदर विमानतळाच्या जमिनीच्या आधिग्रहणाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. या विमानतळाशेजारी एअरपोर्ट सिटी वसविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. पीएमआरडीएने बांधकाम नियमावली मंजूर केल्यामुळे नियोजनबध्द विकासाच्या कामांना वेग आला आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे नागरीकरण करण्यात येत असून स्थानिक भूमीपूत्रांना पूर्णपणे भूमीहीन न करता त्यांना या संपूर्ण व्यवस्थेत सहभागी करून विकास आणि समृध्दी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.  
            पालकमंत्री गिरीश बापट म्हणालेगेल्या काही दिवसात पुणे शहर आणि परिसराचा कायापालट होत आहे. पुणे शहराचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. महाळुंगे-माण हाय-टेक सिटी हा प्रकल्प देशात आदर्श ठरेल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उल्लेखनीय काम सुरू आहे. 
            राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणालेमहाळुंगे-माण हाय-टेक सिटीही नवीन कल्पनांचा संगम आहे. या प्रकल्पामुळे राज्याचे नाव देशभर होईल. अत्याधुनिक शहरामुळे विकासाला चालना मिळेल. पुणे शहर व परिसराचा विकास वेगाने होत आहे.  
तत्पूर्वीकार्यक्रम स्थळी लावण्यात आलेल्या पीएमआरडीए प्रकल्पाच्या प्रदर्शनात नगररचना योजनेच्या नकाशाची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावेळी पीएमआरडीएच्या महाळुंगे-माण हाय-टेक सिटीच्या बोधचिन्हाचे आणि डिजीटल फलकाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पीएमआरडीएच्या ऑनलाईन बांधकाम प्रणालीचे उद्घाटन आणि त्याच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही श्री. फडणवीस यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी केले. आभार अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी मानले.
कार्यक्रमास नगररचना विभागाचे संचालक नागेश्वर शेंडेपीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार देवरेअतिरिक्त आयक्त मिलिंद पाठकउपजिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह लोकप्रतिनिधीविविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामस्थ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
• पीएमआरडीए ला "आंतरराष्ट्रीय प्रीमियम गुंतवणूक क्षेत्र" विकसीत करणार.
• याचा एक भाग म्हणून 'म्हाळुंगे माण हाय-टेक सिटी'ची स्थापना.
• राज्यातील पहिले 250 हेक्टर क्षेत्राचे शहर होणार.
• परिसरासाठी दीड लाख कोटींचा मास्टर प्लॅन.
• प्रकल्पात 14 टीपी स्कीम.
• पायाभूत सुविधांसाठी 620 कोटींची तरतूद.
• रिंगरोडसाठी 10 हजार कोटींची तरतूद.
• सुनियोजित पक्के रस्तेसांडपाणी व्यवस्थापाणीपुरवठाशाळाबगीचेदवाखानेविद्युतीकरण इत्यादी सोयीसुविधा प्राधिकरण कडून उपलब्ध करून देण्यात येणार.
• जमीनधारकांच्या जमिनीस योग्य रुंदीचा रस्ता असलेले भूखंड मिळणार आहे.
• योजनेखालील क्षेत्र मंजूरप्रादेशिक योजनेनुसार शेती तथा नगरविकास विभागात आहे.
• नगर रचना योजनेमुळे कोणतेही अधिमूल्य न भरता विकसनक्षम विभागातील विकसित भूखंड प्राप्त होतो.
• खासगी क्षेत्रातून 23 हजार कोटींची गुंतवणूक.
• नगर रचना योजना 4 टप्प्यांमध्ये करण्याचे प्रस्तावित.
• छोट्या मोठ्या व्यवसायिकांपासून मल्टिनॅशनल कंपन्यांना येथे प्राधान्य दिले जाणार.
• परदेशी कंपन्यादेखील गुंतवणूक करणार.
• दीड लाख लोकसंख्येसाठी प्रामुख्याने टेमघर धरणमुळा नदी आणि पिरंगुटसह सहा गावांत 4 कोटी रुपये खर्च करून पाणी योजना उभारण्यात येणार.
• दळणवळणाची उत्तम सुविधा
• मुंबई- पुणे महामार्गापासून केवळ 300 मीटरवर तसेच हिंजवडी आयटी पार्कलगत.
• प्रस्तावित हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोद्वारे पुण्यातील इतर भागांना जोडले जाणार.
• भविष्यातील हायपरलूप मार्गाच्या प्रथम स्थानकापासून जवळ.
• शहरात 12 ते 36 मीटर रुंद रस्त्याचे जाळे.
• पर्यावरणपूरक विकास करण्यावर भरत्यासाठी मुळा नदीकाठी सुशोभीकरणासाठी 12.50 हेक्टर क्षेत्र आरक्षित.
• सर्वांना उत्कर्षाची संधी देण्यासाठी निवासीवाणिज्य आणि औद्योगिक वापरासाठी 6 दशलक्ष चौरस मीटर क्षेत्र.
• खेळाचे मैदानशॉपिंग सेंटरआंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद केंद्र यासाठी 23 हेक्टर क्षेत्र राखीव.
• परवडणाऱ्या गृहनिर्माणसाठी 13.3 हेक्टर क्षेत्र आरक्षित.
• उद्योगानुकूलता धोरणानुसार गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक खिडकी योजना.
• महाळुंगे- माण वर होणारा खर्च: (कोटी रुपयांमध्ये)
• रस्ते व पूल – 285, नाले – 50, पाणीपुरवठा – 45, सांडपाणी व्यवस्थापन – 37, विद्युतीकरण – 127, सेवा वाहिन्या – 81, नियंत्रण कक्ष – 10, इतर खर्च – 92
****







Monday, October 29, 2018

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 277 पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमीपूजन संपन्न


पुणेदि. 29 – मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पुणे महसूल विभागातील 277 पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आज करण्यात आलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट होतेयावेळी जलसंपदा राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारेपरिवहन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुखविभागीय आयुक्त डॉदीपक म्हैसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीलोणीकर यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील 1 हजार 823.6 लक्ष रुपये रकमेच्या 82 योजनांचेसातारा जिल्ह्यातील 4 हजार 72 लक्ष रुपये रकमेच्या72, सांगली जिल्ह्यातील 4 हजार 824.35 लक्ष रुपये रकमेच्या 33, कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 191.51 लक्ष रुपये रकमेच्या 25 तर सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 299.68 रुपये किंमतीच्या 65 अशा एकूण योजनांचे 277  योजनांचे ई-भूमीपूजन संपन्न झाले.
यावेळी बोलताना पाणीपुरवठा मंत्री श्रीलोणीकर म्हणालेयापूर्वी अनेक जुन्या योजना असल्याने मागील तीन वर्षांत केंद्र सरकारने नव्या योजना सुरू करण्यास स्थगिती दिली होतीत्या सर्व जुन्या योजना पूर्ण करण्यात आल्या आहेतयावर्षी राष्ट्रीय पेयजल योजनेचा 8 हजार कोटींचा आराखडा मंजूर झाला आहेमुख्यमंत्री पेयजल योजनेमार्फतही 1 हजार कोटींची कामे सुरू आहेया सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावेअसे आवाहन श्रीलोणीकर यांनी यावेळी केले.
श्रीलोणीकर यांनी पुणे विभागातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रममुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमजलस्वराज्य टप्पा 2, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीणकार्यक्रमांचा जिल्हानिहाय आढावा घेतलायावेळी कृती आराखडाअंदाजपत्रकेसमाविष्ट उद्दीष्टप्रगतीपथावर असलेल्या योजनांची सद्यस्थिती व कामांदरम्यान निर्माण होणाऱ्या अडीअडचणी व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार दिलीप सोपलज्येष्ठ आमदार गणपत देशमुखआमदार बाबूराव पाचर्णे,आमदार भारत भालके,आमदार नारायण पाटीलआमदार राहूल कुलआमदार प्रशांत परिचारकसोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदेसांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुखकोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडीकविकास उपआयुक्त चंद्रकांत गुडेवारपुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम,महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळकार्यकारी अभियंता वैशाली आवटे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000



Tuesday, October 23, 2018

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथून दिल्लीकडे प्रयाण


पुणे दि. 23: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथून दिल्लीकडे प्रयाण झाले.  यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांना निरोप दिला.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापटपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकलेफ्टनंट जनरल मनोज पांडेएअर कमोडोर के.व्ही.एस. नायरविभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरपोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशमजिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते .
00000


सिम्बायोसिस विद्यापीठाचा १५ वा पदवीदान समारंभ थाटात संपन्न



देशाच्या शैक्षणिक परंपरेचा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे 

                                                                                                                          - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे दि. २३: भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे, तक्षशिला ते नालंदा असा आपल्या देशाला मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौध्दिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले.  
लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या १५ व्या पदवीदान समारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी सविता कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, लेह-लडाखचे शिक्षणतज्ज्ञ तथा शास्त्रज्ञ डॉ. सोनम वांगचूक उपस्थित होते.  
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, शिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा वसुधैव कुटुंबकमचा वारसा सिंम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, ही गौरवाची बाब आहे. या ठिकाणी शिक्षण घेतलेले परदेशातील विद्यार्थी आपले कायमचे मित्र तर होतीलच, परंतु ते आपले अनौपचारिक राजदूत म्हणून काम करतील, असा विश्वास श्री. कोविंद यांनी व्यक्‍त केला.
 राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुढे म्हणाले, देशातील अनेक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना भेट देवून तेथील विद्यार्थ्यांशी संवाद संवाद साधतो, आता गुणवत्तेत मुलांपेक्षा मुलीचे प्रमाण वाढल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. हे आपल्या समाजासाठी आनंदाचे द्योतक असून अभिमानाची बाब आहे. पुणे शहराला मोठी शैक्षणिक परंपरा आहे. १९४८ साली फुले दाम्पत्याने पहिली मुलींची शाळा सुरू करून या परंपरेला सुरुवात केली. त्याच बरोबर न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध असल्याचे श्री. कोविंद यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शास्त्रज्ञ डॉ. सोनम वांगचूक यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.  कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.    
यावेळी डॉ. सोनम वांगचूक, कुलगुरु रजनी गुप्ते यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले. तर आभार कुलसचिव एम. जी. शेजूल यांनी मानले. यावेळी विद्यापीठाच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******










Saturday, October 20, 2018

वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूक नगर निर्मितीसाठी योगदान द्यावे … मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


                                                                                  

        पुणे,दि.20 :-  मोठया प्रमाणावर शहरीकरण होत असताना शहरांचा नियोजनबध्द विकास होणे गरजेचे आहे. सध्या तापमानवाढीचं मोठ संकट आपल्यासमोर आहे. यासाठी वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा विचार करुनउत्कृष्ट दर्जाच्या नगर निर्मितीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            सतीश मिसाळ एज्युकेशन फाऊंडेशनच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरउंड्री या संस्थेचा पहिला पदवीप्रदान समारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याहस्ते संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेमहापौर मुक्ता टिळकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु नितीन करमळकरसंस्थेच्या विश्वस्त आमदार माधुरी मिसाळकार्यकारी संचालक पूजा मिसाळदीपक मिसाळप्राचार्या पूर्वा केसकर आदि मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमात थेसीस कॅटलॉगचे प्रकाशन श्री.फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
                पदवी संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणालेइतक्या कमी वेळेत आणि कमी काळात ब्रिक एज्युकेशन संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात चांगले नाव कमाविले आहेहे कौतुकास्पद आहे.
 नगर नियोजनात शाश्वत विकासाचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगून ते पुढे म्हणालेजगातलं सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र भारतात तयार झालं आहे. हडाप्पा आणि मोहंजोदडोसारखी सुनियोजित शहरे ही प्राचीन काळातील उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राची उदाहरणे आहेत. सध्या नगररचना नियोजनाची पर्यायाने अधिक नगररचनाकारांची आवश्यकता आहे. देशाची निर्मिती व बांधणीमध्ये या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे व दर्जेदार मानव संसाधन निर्माण करावे.
            एकविसावे शतक सर्वोत्तम गुणवत्तेचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी सामान्य दर्जाचे न राहता अधिकाधिक ज्ञान ग्रहण करुन समाजाला उत्कृष्ट सेवा पुरवावी. देशाचा विकास झपाटयाने होत असतांना विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानरुपी अश्वावर स्वार होणे आवश्यक आहेअसे सांगितले. आपल्याला समाजाकडून जे मिळतेते समाजाचं देणं असतं. आपल्या कार्यकर्तृत्वातून विद्यार्थ्यांनी समाजाला परत देण्याची भूमिका घ्यावीअसे आवाहन श्री.फडणवीस यांनी यावेळी केले.
            महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्यासंस्थेच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तरुणांनी नवनवी आव्हानं पेलून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. आव्हानांना सामोरं जाताना अपयश आलं तरीही विद्यार्थ्यांनी खचून न जाता धैर्याने यशस्वी वाटचाल करावी. आर्किटेक्टचे विद्यार्थी म्हणजे नवनव्या संकल्पना मांडून त्या साकार करण्याची क्षमता असणारे विद्यार्थी असतात. आपल्या संकल्पना मूर्त स्वरुपात आणून देशाच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावेअसेही त्या म्हणाल्या.
            प्रास्ताविकातून पूजा मिसाळ यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. प्राचार्या पूर्वा केसकर यांनी आभार मानले. यावेळी खा.अनिल शिरोळे,आ.भीमराव तापकीरआ.संजय भेगडे,आ.योगेश टिळेकर तसेच लोकप्रतिनिधीशिक्षण क्षेत्रातील मान्यवरविद्यार्थीपालकशिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.






Wednesday, October 17, 2018

संभाव्य टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना



सोलापूर, दि. 17 : सोलापूर जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार, मनरेगा, सिंचन विहिरी आदी कामे चांगली झाली आहेत. मात्र यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अवघा 38 टक्के पाऊस झाला आहे. अगामी काळात टंचाईची परिस्थिती उद्भवू शकते याचा विचार करून शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना देत जिल्ह्यातील विकासाला गती देवून दोन महिन्यात उर्वरीत विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.
सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकपाणी व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आज बहुउद्देशीय सभागृहात घेतला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील  उपस्थित होते.
या बैठकीत मुंबई येथून मुख्य सचिव डी.के.जैन यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'सोलापूर जिल्ह्यात यावर्षी अवघा  38 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 91 मंडलापैकी 68 मंडलात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तुलना करता ही स्थिती सन 2015 सालाशी साधर्म्य असणारी आहे. दुष्काळाच्या संदर्भात केंद्र शासनाने 2016 मध्ये काही वैज्ञानिक निकष घालून दिले आहेत. यामध्ये कमी पर्जन्यमानाबरोबरच दोन पावसातील खंडीत अंतराचा समावेश आहे. तसेच किमान 10 गावात पीक कापणीचे प्रयोग करून त्यांचे विश्लेषण करून टंचाई घोषीत करण्याबाबत निर्णय देण्यात येणार आहे. या वैज्ञानिक निकषांच्या आधारावर आपली पाहणी सुरू असून त्याचे अहवाल आल्यानंतरच याबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल.
सुदैवाने यावर्षी उजनी धरणात 96 टक्के पाणी आहे, त्यामुळे या टंचाईची तीव्रता कमी भासेल असे सांगत टंचाईची तीव्रता कमी भासावी यासाठी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांच्या अधिग्रहणासह चारा लागवडीचे नियोजन करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.   
राज्य शासनाच्या अग्रक्रमांच्या योजनांतील जलयुक्त, शेततळे, नरेगामध्ये विहीरींची कामे चांगल्या पद्धतीने झाली आहेत. मात्र काही योजनांमध्ये कामे रेंगाळली आहेत. ग्राम सडक योजनेची प्रगती मंद गतीने होत आहे. त्यामुळे यंत्रणेने यामध्ये लक्ष देऊन मार्चपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तालुका स्तरावर नियोजन करावे. येत्या दोन महिन्यांत विकासकामे ‘मिशन मोड’ मध्ये पूर्ण करावीत. या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी  दोन महिन्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेत कर्जाची  हमी शासनाने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाने प्रकरणे मंजूर करून अर्थसहाय उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांशी समन्वय साधावा. महामंडळाने संबंधित बँकांच्या जिल्हा समन्वयकांना यादी उपलब्ध करून पात्र अर्जदारांना वित्त सहाय्य तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करावा. मुद्रा योजनेत सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले झाले असून 1 लाख 34 हजार 845 लाभार्थ्यांना 524.15 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झाले आहे. संपर्ण राज्यात ही आकडेवारी अत्यंत चांगली आहे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
भूसंपादनासाठी निधी
            सोलापूरसाठीच्या थेट पाईपलाईन प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांचा निधी दिला जाईल मात्र पाईपलाईन प्रकल्प गतीने पूर्ण करायला हवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पिण्याचे पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम आराखडा स्तरावर आहे. मात्र भूसंपादन आणि प्रकल्पाची किंमत साडेचारशे कोटी रुपये असल्याने त्याची निवीदा प्रक्रीया राबवण्यास उशीर होत असल्याचे सोलापूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आता निवीदा प्रक्रीया सी फॉर्म पध्दतीने केली जावी. त्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया 31 ऑक्टोबरपुर्वी करावी आणि कामकाजास सुरुवात केली जावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            सेालापूर शहरात पंतप्रधान आवास योजनेतून 220 घोषित झोपडपट्ट्यांवर नवीन घरकुले बांधण्याच्या कामास प्राधान्य दिले जावे. या योजनेत जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न करावेत. रे नगर येथील गृहनिर्माण प्रकल्पास राज्य शासनाने 120 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे असंघटीत कामगारांना हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            सोलापूरमध्ये अमृत अभियानातून उभारण्यात येणारे शहरी भुयारी गटार योजना, टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि पाणी पुरवठा योजना यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात आला आहे. निधीची गरज भासल्यास नगरोत्थान योजनेतून आणखी निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गुन्हे  उघडकीस आणण्यासह
अपराधसिध्दीचे प्रमाण वाढवा
            सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असणारे घरफोडी, मोबाईल चोरी आणि इतर चोऱ्यांना आळा घालण्यासाठी उपायोजना करताना या प्रकरणातील गुन्हे उघडीस आणण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा. त्याच बरोबर चोरीला गेलेला माल परत मिळवून तो मूळ मालकांना देण्याची प्रक्रीया गतीने राबविण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.
            गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारी वकील आणि पोलीस यांनी समन्वयाने काम करावे. सामान्यांचा विश्वास पोलीस यंत्रणेवर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस विभागातील वरिष्ठांनी सामान्य कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवावा. सोलापूरमधील पोलीस वसाहतींचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबरोबरच पोलीसांसाठी मालकी हक्कांच्या घरांची योजना राबविण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचना श्री फडणवीस यांनी  दिल्या.  
            यावेळी महसूल, पोलीस, सार्वजनिक आरोगय, न्यायालयीन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आदी विभागाचे अधिकारी उपस्थ‍ित होते.
0000