Friday, May 18, 2018

पुणे विभागाला 1 कोटी 55 लाखाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट उत्तम नियोजनाबरोबरच पारदर्शकता ठेवा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार



·         प्रत्येक विभागाच्या बजेटमधून वृक्ष लागवड-संवर्धनासाठी 0.5 टक्के निधी वापरण्याची तरतूद.
·         शेततळ्यांच्या बाजूला बांबू लागवडीवर भर.
·         पुणे, राहुरी आणि अमरावती विद्यापीठात बांबू पासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणार.
·         तूती लागवडीच्या क्षेत्रात वाढ करून रेशीम उद्योगाला चालना देणार.
·         फलोत्पादनाची मर्यादा 4 हेक्टरवरून 6 हेक्टर वाढविली.
·         वृक्ष लागवडी बरोबरच वृक्ष जगण्याच्या प्रमाण वाढविण्यावर भर.
·         केंद्र सरकारच्या पाहणीत वनेतर क्षेत्र, कांदळवन, बांबू लागवडीत महाराष्ट्र देशात अव्व्ल.
·         वनेत्तर क्षेत्रात राज्यात 273 स्क्वेअर किलोमीटर वाढ.
·         कांदळवन क्षेत्रात राज्यात 82 स्क्वेअर किलोमीटर वाढ.
·         बांबू लागवड क्षेत्रात राज्यात 4 हजार 465 स्क्वेअर किलोमीटर वाढ.
·         ‘रानमळ्या’च्या धर्तीवर राज्याभर ग्रामीण व नागरी क्षेत्रात रानमळ्याच्या धर्तीवर उपक्रम राबविणार.
·         येत्या वर्षात हरीत सैनिकांची संख्या 1 कोटींवर नेणार.
पुणे, दि. 17    पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून यावर्षी 1 ते 31 जुलै दरम्यान 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागासाठी 1 कोटी 55 लक्ष 90 हजाराचे उद्दिष्ट  देण्यात आले असून त्या त्या जिल्हयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. आजच्या विभागीय आढावा बैठकीत संबंधित यंत्रणेने आपले सादरीकरण केले, यावेळी बोलताना वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम नियोजनाबरोबरच पारदर्शकता ठेवा आणि विविध संस्था, संघटना व लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घ्या, असे आवाहन बैठकीत केले.
विधान भवनाच्या सभागृहात पुणे विभागातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व सांगली  जिल्हयाची आढावा बैठक सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार सर्वश्री उदयनराजे भोसले, शिवाजीराव आढळराव-पाटील, अनिल शिरोळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकाते-पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, बबनराव शिंदे, आनंदराव पाटील, प्रशांत परिचारक, विजय काळे, जगदिश मुळीक, भीमराव तापकीर, आमदार मेधा गाडगीळ, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) व्ही. के. आगरवाल, मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी, मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व नियोजन) एस. एच. पाटील, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, कृषी, वन, जलसंपदा व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित  होते.
प्रारंभी विभागीय आयुक्त यांनी आपल्या प्रस्ताविकात पुणे विभागात वृक्ष लागवडीचे 1 कोटी 55 लाख 90 हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 2 कोटी 99 लक्ष रोपे उपलब्ध आहेत. 1 कोटी 17 लक्ष 72 हजार खड्‌याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 76 टक्के खड्डे खोदून झाले आहेत.  हरीत सेनांचे उद्दिष्ट 13 लाख 64 हजाराचे असून 7 लाख 10 हजाराचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वृक्ष लागवडीसाठी 2 लाख 63 हजार 748 हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून त्याची लांबी 39 हजार 219 किलोमीटर एवढी आहे. वन, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत या बरोबरच 33 विभागांना  वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
गत दोन वर्षातही या विभागात चांगले काम झाले आहे. 2016 या वर्षात राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. पुणे विभागाला 21 लाख व 30 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी 48.4 लक्ष वृक्ष लागवड करुन 227 टक्के काम पूर्ण झाले.  त्यापैकी जिवंत वृक्षांचे प्रमाण 73 टक्के एवढे आहे.
2017 यावर्षी राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना पुणे विभागात 56 लाख 9 हजाराचे उद्दिष्ट दिले होते. गतवर्षी विभागाने 61 लाख 3 हजार वृक्ष लागवड करुन 108 टक्के काम पूर्ण केले. जिवंत वृक्षाचे प्रमाण 81 टक्के आहे. यावर्षी हरित सेनाचे उद्दिष्ट 13 लक्ष 64 हजार असून 7 लाख 6 हजार 989 एवढी नोंदणी पूर्ण झाली आहे. ती देखील लवकरच पूर्ण होईल.
·         वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध क्षेत्र
वृक्ष लागवडीसाठी वन विभागाचे 17 हजार 745 हेक्टर, खाजगी क्षेत्र 82 हजार 12 हेक्टर, रस्ते कॅनॉल, रेल्वे 36 हजार 884 किलोमीटर, नदी किनारी क्षेत्र अंतर्गत वनविभाग 4 हजार 256 हेक्टर, शासकीय क्षेत्र 7 हजार 822 हेक्टर खाजगी क्षेत्र 2 लाख 21 हजार 470 हेक्टर, याप्रमाणे जागा वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय वन आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या 285 अशासकिय संस्थांचा सहभाग असणार आहे. 1 ते 31 जुलै  2018 दरम्यान वृक्ष लागवड करण्यासाठी वनविभागने खड्डे खोदण्याचे काम 100 टक्के पूर्ण केले आहे.
यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकरी, मनपा आयुक्त नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांच्याकडून माहिती  जाणून घेतल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर पुढे म्हणाले, हे काम केवळ शासकीय स्वरुपाचे नाही. यामध्ये संस्था, संघटना  व व्यक्तींचा सहभाग असल्याशिवाय उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. सार्वजनिक जागेबरोबरच, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा, कॉलेज प्रत्येकाच्या घरासमोर झाडे लावली पाहिजेत. जल है तो कल हैअसे सांगून ते पुढे म्हणाले, पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे. भविष्यकाळ चिंतेचा असणार आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करणे क्रमप्राप्त आहे. आपल्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा अधिकारी व लोकप्रतिनीधींनी एकजुटीने काम करावे, आणि वृक्ष लागवडीचा उच्चांक प्रस्थापित करावा,असे आवाहन त्यांनी केले.
*****







No comments:

Post a Comment