Tuesday, August 2, 2016

बालकांच्या पुरस्कारासाठी 15 ऑस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत


          सातारा, दि. 2 (जिमाका) : सन 2015-2016 च्या  प्रस्तावासाठी 1 जुलै 2015 ते 30 जून 2016 या कालावधीमध्ये शौर्य दाखविलेल्या बालकांच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव दिनांक 15 ऑगस्ट 2016 पर्यंत  सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.व्ही.शिंदे यांनी केले आहे.
                भारतीय बाल कल्याण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने 1957 पासून दरवर्षी शौर्य बालक पुरस्कार दिला जातो. वय वर्ष 6 ते 18 वयोगटातील मुला मुलींनी दुस-याचे प्राण वाचविण्यासाठी अथवा अपघात टाळण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून अथवा  प्रसंगावधान दाखवून अतुलनीय साहस दाखिविल्याबद्दल राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात येतो. सन 2015-16 च्या प्रस्तावासाठी  1 जुलै 2015 ते 30 जून 2016 या कालावधीमध्ये शौर्य दाखविलेल्या बालकांच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत असून प्रस्तावासोबत घडलेल्या घटनेचा तपशिल स्वतंत्रपणे  इंग्रजी  किंवा हिंदीत असणे आवश्यक आहे. तपशिल अधिकृत असावा घडलेल्या घटनेमध्ये अर्जदार मुला मुलीने व्यक्ति:शा केलेल्या साहसाचा तपशिल, उल्लेख हिंदी व इंग्रजीत असणे आवश्यक आहे. या संबंधीत स्थानिक वर्तमानपत्रात आलेल्या घटनेचा वृत्तांत, दुरदर्शन किंवा इतरत्र प्रसिध्द झालेल्या बातमीचे फोटो इ. प्रमाणित करुन प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. मुलाच्या वयाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत, जिल्हाधिकारी, सरकारी अधिकारी, पोलीस खात्यातील प्रमुख, जिल्हा, राज्य पातळीवरील, पंचायत, जिल्हा परिषद प्रमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक यापैकी एका व्यक्तीचे शिफारस पत्र जोडणे आवश्यक आहे.
                प्रस्ताव सादर करण्याकरीता व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,नविन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी.स्टॅण्ड शेजारी. ता.जि.सातारा दुरध्वनी क्र.02162-237353 यांच्याकडे संपर्क साधून परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 15 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करावेत असेही श्री.शिंदे यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment