Friday, September 18, 2020

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

 पुणे दि.18:  पुणे जिल्ह्यात 'कोरोना'च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

             विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे),  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त तथा ससून रुग्णालयाचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला,  वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

             उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील 'कोरोना'चा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा  व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने  गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत, अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही  त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. 

          राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये  कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा व साधन सामग्री उपलब्ध असल्याची खात्री जिल्हा शल्यचिकित्सक यांनी करावी. या भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना गृह विलगीकरण करण्यात येणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. गृहविलगिकरण केलेल्या रुग्णांना दुरध्वनीव्दारे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांची माहिती अद्यावत ठेवावी. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील व खाजगी प्रयोगशाळांमध्ये आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी. जेणेकरुन संसर्ग रोखणे सोपे होईल. 

               राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शहरी भागातील रुग्णालयांवर  ग्रामीण भागातील रुग्णांचा ताण वाढू नये यासाठी ग्रामीण भागातच पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच ऑक्सीजनयुक्त बेड, व्हेंन्टीलेटर व अन्य उपकरणे सुरळीत सुरु ठेवावीत. 

              आशा वर्कर व अंगणवाडी सेविका 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजनेचे सर्वेक्षण करत आहेत. त्यांचे संरक्षण व इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली.

            यावेळी आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके व आमदार राहुल कुल यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना  वेळेत उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात असे सांगून आवश्यक त्या सूचना केल्या. 

           जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यातील  कोरोनाबाधित रुग्ण, अति जोखीम व कमी जोखीम नागरिक, कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या तसेच रुग्णदर व मृत्युदराबाबत माहिती देवून ऑक्सिजन पुरवठा नियोजन व बेडची उपलब्धता तसेच उपाययोजनांची माहिती दिली.  

                                                                                 0000       






अखिल भारतीय वारकरी मंडळ हवेली तालुका कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेश प्रदान

    



पुणे दि.18:- पुणे जिल्हयातील अखिल भारतीय वारकरी मंडळ, हवेली तालुका कमिटीच्या वतीने 1 लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड 19 साठी सुपूर्द करण्यात आला यावेळी मंडळाचे तालुका अध्यक्ष संतोष महाराज काळोखे देहूकर व अन्य पदाधिकारी, वारकरी उपस्थित होते.

                                                                                   ००००

'कमवा व शिका' योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

 पुणे दि.18:- पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

  विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पशुसंवर्धन व कृषी सभापती रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, समाज कल्याण विभागाचे सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार  तसेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

  गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांसाठी प्रशासकीय कामाचा अनुभव आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मासिक वेतनही देण्यात येणार आहे.

                                                                                    








0000

रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार

 पुणे,दि. 18 : 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावात्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नयेयाची खबरदारी घेण्याच्या सूचना देत 'कोरोना'बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबविण्याचे  निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 'कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी तसेच 'कोरोना'बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

          विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटीलसार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारणपदुमवनेसामान्य प्रशासन विभागाचे  राज्यमंत्री दत्तात्रय भरणेपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळविभागीय आयुक्त सौरभ रावजमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगमपोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशमपिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमारजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादडॉ. सुभाष साळुंखेससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

           उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारीही मोहिम सुरु केली आहे. 'कोरोना'ला हरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीपदाधिकारीस्वयंसेवी संस्थाशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांचा या मोहिमेतील सहभाग महत्त्वाचा असून या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

                        'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नयेयासाठी प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावेकोरोना उपाययोजनांची प्रत्येक माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जबाबदारीपूर्वक करावेअशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.           

            महापौर मुरलीधर मोहोळ म्हणालेकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेचे आहे. जम्बो रुग्णालयातही बेड वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

            विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी 'माझे कुटुंबमाझी जबाबदारी'  अभियानाचा तपशील व पुढील नियोजनसामाजिक कृतिशील समूह समितीऑक्सीजन पुरवठा नियोजनबेड उपलब्धतापुणे जिल्हयाची अनुमानित रुग्णसंख्येचा तपशीलअनुमानित बेड संख्येचा तपशीलआवश्यक असणा-या बेडसाठी प्रस्तावित उपाययोजनाव्हेंटीलेटर उपलब्धता आदी उपाययोजनांची माहिती दिली.

           जमाबंदी आयुक्त  तथा ससूनचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णांलयातील व्यवस्थापन व उपचार पध्दतीची माहिती दिली.

            जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

***









उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

 पुणे दि.18:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रोचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथून पाहणी दौ-यांला प्रारंभ केला. यावेळी अजित पवार यांनी मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला. ब्रिजेश दीक्षित यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. सिव्हील कोर्ट,नळस्टॉप,लकडी पूल व स्वारगेट  येथील कामाचीही त्यांनी पाहणी केली तसेच आधुनिक पदधतीने बोगदा खोदकाम करणा-या नवीन मशिनचेही मेट्रोकामासाठी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मेट्रोचे गौतम बि-हाडे, श्रीमती सरला कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                                                                            





0000

Friday, September 11, 2020

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे - उपमुख्यमंत्री अजित पवार









पुणे,दि. 11 : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी दिले.


            पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त कृष्‍ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


            पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. कोरोना परिस्थती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी  विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये तसेच कामात गतीमानता येण्याच्या दृष्टिने  विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे, असे त्‍यांनी सांगितले. विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. ऑक्सिजन टँकरचा वाहतुकी दरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसेच रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला ॲम्ब्युलन्स प्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी. तसेच पोलीस विभागाने ऑक्सिजन टँकर मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरुन हे टँकर वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडतील.


            जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील 50 टक्के निधी कोविड नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी वापरुन कोरोना रोखण्‍यासाठी प्रभावीपणे काम करावे, असे सांगून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळवून देण्याचे नियोजन करावे तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याची खात्री करावी,  असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


            रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन दोन्ही महापालिकांनी करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 सप्टेंबर पासून राज्यभर ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावांमधील दक्षता समित्या व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे. हे अभियान सर्वांनी मिळून प्रभावीपणे राबवूया, असे आवाहनही त्यांनी केले.


            महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असून गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेडची गरज भासत आहे, यासाठी आणखी बेड वाढविणे गरजेचे आहे. रुग्णांना तात्काळ बेड मिळवून देण्यासाठी बेड व्यवस्थापन प्रभावीपणे व्हायला हवे.


            विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्त  तथा ससूनचे समन्‍वय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णांलयातील व्यवस्थापन व उपचार पध्दतीची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तसेच बेड व्यवस्थापनाच्या दृष्टीने तालुकानिहाय नियोजन करण्यात आल्याची  आणि तपासण्या वाढविण्यात आल्याची माहिती दिली.


            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.


                                                  000

Thursday, September 10, 2020

प्रत्येक गरजू रूग्णांस रूग्णवाहिका मिळावी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

 

            सोलापूर,दि.10: ग्रामीण भागात 108 व इतर रूग्णवाहिका आहेत. मात्र त्या वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांना वैद्यकीय सेवा त्वरित मिळावी. प्रशासनाने प्रत्येक गरजू रूग्णांस रूग्णवाहिका मिळावी, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

            आरोग्य विभागाच्या विविध बैठकांदरम्यान श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, लसीकरणांशी निगडीत शासकीय आणि खाजगी दवाखान्यांचे प्रतिनिधी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, समितीचे सदस्य उपस्थित होते.

            यावेळी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुकाणू व संनियंत्रण समिती, नियमित लसीकरण, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि आपत्कालिन वैद्यकीय सेवा समितीचा श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

            श्री. शंभरकर म्हणाले, रूग्णवाहिकांचा वापर पूर्ण सॅनिटायझर करून करा. रूग्णवाहिकेबाबत नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत, याची खबरदारी घ्या. रूग्णवाहिका वाढविण्यावर भर द्या. मातृ वंदना योजनेचे काम ग्रामीण भागात चांगले झाले आहे. नागरी भागातील लक्ष्यही त्वरित पूर्ण करा. गरीब रूग्णांपर्यंत पोहोचून त्यांना योजना समजावून द्या. एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी यंत्रणेने प्रयत्नशील रहावे. याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचवा. यासाठी नेहरू युवा केंद्राची मदत घ्या. तरूणांमध्ये जागृती करा.

            लसीकरणाबाबत श्री. शंभरकर म्हणाले, सध्या सर्व भर कोविडवर असला तरी नियमित लसीकरण योग्य खबरदारी घेऊन करणे गरजेचे आहे. लहान मुलांवर भर द्या. गरोदर माता, बालके यांची काळजी घ्या. अनुभव संपन्न अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

            राज्य वैद्यकीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे लसीकरणावर भर देण्याचे आवाहन केले. बफर आणि कंटेन्मेंट झोनमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून लसीकरण घ्या. 65 वर्षांवरील नागरिकांनी बाळाला लसीकरणाला घेऊन येऊ नये, याबाबत सूचना द्या. मिझल्स-रूबेला लसीबाबतही आढावा बैठका तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

            जिल्ह्यात 108 च्या 35 रूग्णवाहिका असून यापैकी 19 कोविड रूग्णांसाठी तर 16 नॉन कोविड रूग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. कोविड काळात 15934 रूग्णांना याद्वारे सेवा देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

माता बाल संगोपन अधिकारी एस.पी. कुलकर्णी यांनी मातृ वंदना योजनेबाबत माहिती दिली. जिल्ह्यात 88 टक्के लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सर्वात जास्त पंढरपूर तालुक्यात 102 टक्के, उत्तर सोलापूर 99 टक्के, दक्षिण सोलापूर 94 टक्के, माढा 90 टक्के काम झाले आहे. सर्वात कमी मोहोळ 75 टक्के, अक्कलकोट 83 टक्के, मंगळवेढा, बार्शी आणि करमाळा 84 टक्के, सांगोला आणि माळशिरस 85 टक्के काम झाले आहे. नगरपरिषद भागात मंगळवेढ्यात एकही नोंदणी नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आधारकार्ड जुळत नसल्याने 3270 जणांना लाभ देता आला नाही, त्यांचे आधारकार्ड पुन्हा नोंदणीचे काम सुरू असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

 

0000000

--

Wednesday, September 9, 2020

नवपदविधरांसाठी एमटीडीसीचा ईंटर्नशिप कार्यक्रम महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी


 

मुंबई, दि. ९ सध्याच्या जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ईंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नवपदवीधरांकरीता एमटीडीसी कार्यक्रम सुरू करीत आहे. या कार्यक्रमात ईंटर्नना सोशल मिडिया बिझनेस डेव्हलपमेंटएचआरआयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच एमटीडीसीच्या अखत्यारीत असलेल्या निसर्गरम्य रिसॉर्टअॅडव्हेंचर पार्कडायव्हींग संस्थाइत्यादींच्या विकासासाठी आपल्या कल्पना मांडता येतील व विकास प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदविता येईल.

महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असतानापर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल. या कार्यक्रमात ईंटर्नना एमटीडीसीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभागाचे मंत्री तसेच महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. ईंटर्नना दहा हजार रूपये मानधन व एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीने अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल. ईंटर्नना काम करण्यासाठी कार्यालयात येणे अनिवार्य आहे. सोशल मिडीयाचे काम करणाऱ्या उमेदवारांचे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे. ईंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असेलमात्र जे उमेदवार आपले काम कुशल व निर्विवार्द करतील त्यांना ५ महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाईल.  २५ वर्षापेक्षा खालील वयाचे उमेदवार या ईंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतीम मुदत १६ सप्टेंबर२०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. 

तरुणांच्या संकल्पनांना चालना देणार – मंत्री श्री. आदित्य ठाकरे

राज्याचे पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. यात युवकांच्या नवकल्पनांचीही आवश्यकता आहे. एमटीडीसीसोबत महाराष्ट्राचे पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे पर्यटन वैभव संपूर्ण विश्वाला दाखवण्यासाठी या कार्यक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे. प्रवास व पर्यटनाची आवड असेल तर एमटीडीसीच्या या नवीन मोहीमेचा भाग व्हा. कार्यकुशल उमेदवारांच्या संकल्पनांना यात निश्चित चालना दिली जाईलअसे ते म्हणाले.

००००

पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे तयार करा घरीच कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला


            सोलापूर,दि.9सोलापूर जिल्ह्यात यंदा अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बियाणे कंपन्याही पुढच्या वर्षी सोयाबीनचे बियाणे पुरवठा करण्याच्या मानसिकतेत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनचे बियाणे तयार करावेतअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

            यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर अखेर 428.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून याची टक्केवारी 119.7 आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेराही वाढला असून 61 हजार 207 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी 162 टक्के आहे. यात बार्शी तालुक्यातील क्षेत्र 31 हजार 749 हेक्टर आहे. काही ठिकाणी बियाण्यांच्या तक्रारी आल्या असून यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी घरच्या घरीच बियाणे तयार करावे लागणार आहे. बियाणांचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे शेतावरच तयार करता येणार आहे. याची प्रक्रियाही सोपी आहे.

बियाणांची निर्मितीकाढणी आणि साठवणूक यावेळी काळजी घेतल्यास दर्जेदारगुणत्तापूर्ण बियाणे घरच्या घरी तयार करू शकतोअसेही श्री. माने यांनी सांगितले.

        बियाणे तयार करण्याची पद्धत आणि घ्यावयाची काळजी

  • ज्या शेतातील बियाणे तयार करणार आहोततेथील तण, भेसळरोगटशेंगा भरत असलेली झाडे काढून टाकावीत.
  • कीड आणि रोगाचा बंदोबस्त करावा. शेंगा भरत असताना आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावीत्यामुळे साठवणुकीमध्ये बुरशी वाढणार नाही.
  • चारही बाजूला त्याच वाणाचे सोयाबीन असावे. नसेल तर ज्या बाजूला वाणाचे बियाणे नाहीत्या बाजूला बांधापासून 3 मीटर आतपर्यंतची झाडे बियाणासाठी काढणीच्यावेळी घेऊ नयेत.
  • कापणी वेळीच करावी. कापणीनंतर पावसात भिजलेले बियाणे राखून ठेऊ नये.
  • सोयाबीन पीक परिपक्व अवस्थेत असताना पाऊस आल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कायम राखण्यासाठी कापणीपूर्वी बाविस्टीन किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • कापणीनंतर बियाण्यातील आर्द्रता 13-14 टक्के आणण्यासाठी 1 ते 2 दिवस बियाणे उन्हात सुकवावे. उत्पादित बियाणांची आर्द्रता 14 टक्के असेल तर मळणी यंत्राचा वेग 400 ते 500 आरपीएम आणि 13 टक्के असेल तर वेग 300 ते 400 आरपीएम असावा. अन्यथा बियाणांमध्ये तांत्रिक नुकसान होऊ शकते.
  • बियाणे वाळविताना मोठा ढीग न करता पातळ थरावर वाळवावे. साठवणूक करण्यापूर्वी बियाणातील आर्द्रता 9 ते 12 टक्के असेल याची काळजी घ्यावी.
  • वाळलेले आणि स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूट बारदानामध्ये भरावे. पोत्यामध्ये साधारण 60 किलोपर्यंत बियाणे साठवावे.
  • साठवणूक करतेवेळी एकावर एक थप्पी ठेवण्याऐवजी बियाणे वेगळे ठेवावे. जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळ्यांचा वापर करून कोरड्या जागी साठवणूक करावी.
  • पोत्याची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाणांची गुणवत्ता जास्त काळ टिकण्यास मदत होईल. बियाणे नाजूक असल्याने उंचावरून आदळणार नाहीतयाची काळजी घ्यावी.
  • आपल्या बियाणांची उगवणक्षमता तीनवेळा म्हणजे डिसेंबरमार्च आणि जूनमध्ये चाचणी करूनच पेरणी करावी.

 

00000000

“विकेल ते पिकेल” धोरणावर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

 

कृषी विभागाच्या युट्युब चॅनेलवर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण


पुणे,दि.9: कृषि विषयक विविध योजनां संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 ते 1.30 यावेळेत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत.


 हा कार्यक्रम online होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात येणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. 


कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण कृषि विभागाच्या  (http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM) या यु-ट्युब चॅनेलवर  करण्यात येणार आहे.


“विकेल ते पिकेल” अभियान शुभारंभ व मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन प्रकल्प (SMART) या जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्पाचा शुभारंभ यावेळी करण्यात येईल. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून “चिंतामुक्त”  शेतकरी  व “शेतकरी केंद्रित” कृषि विकास यावर विचार व्यक्त करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

     00000

Monday, September 7, 2020

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख







 

पुणेदि. ७:- पुणेपिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या संकट काळात कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक पिळवणूक होवू नये यासाठी मानवतेच्या भावनेने सर्वांनी मिळून मदत करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी  करावीअशी सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केली. तसेच या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावीअसेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी आवाहन केले.

        जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेवून संवाद साधला. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकरमहात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे विभागीय समन्वयक डॉ अमोल म्हस्केजिल्हा समन्वयक डॉ सागर पाटीलडॉ प्रिती लोखंडेएम.डी. इंडियाचे प्रतिनिधी अविनाश बागडे उपस्थित होते.

            प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ‌ नांदापूरकर यांच्या समवेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्ह्यात अमंलबजावणीच्या अनुषंगाने रुग्णालयांच्या प्रतिनिधींकडून येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणालेमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोनाच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रुग्णालयांनी  हजार 609, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रुग्णालयांनी २ हजार ३१पुणे जिल्ह्यतील ग्रामीण भागातील रुग्णालयांनी ६८७ असे एकूण  हजार 327 रुग्णांला लाभ देण्यात आलेला आहे.  यातून असे निदर्शनात येते कीकाही रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहेही निश्चितच समाधानकारक बाब आहे. परंतु काही रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना अपेक्षित लाभ देण्यामध्ये कमी पडलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी याप्रकरणी गांभीर्याने व संवेदनशीलतेने लक्ष घालून परिस्थिती सुधारावीकोरोना बाधित रुग्णाला मदत करावीया योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभागजिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच आरोग्य मित्र यांच्या समन्वयाने रुग्णालयांनी काम करावे.  ही योजना सर्व लोकप्रतिनिधींमार्फत सर्व नागरिकांपर्यत पोहचवावीअशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या. रुग्णालयाच्या प्रलंबित देयकाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.

          महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता रुग्णालयांकडून सहकार्य करण्यात येईलअसे आश्वासन यावेळी रुग्णालयांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आले.

Saturday, September 5, 2020

खासदार शरद पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या श्री. पवार यांच्या सूचना





 

·       उपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरआरोग्य मंत्री राजेश टोपेकामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

 

·       कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्या.

·       मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करा.

 

            पुणे,दि. 5: कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्यायला हवेतअशा सूचना खासदार शरद पवार यांनी केल्या.

            कोविड 19 विषाणू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन सभागृहात आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरआरोग्य मंत्री राजेश टोपेकामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलसार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आलीयावेळी श्री. पवार बोलत होते.

            बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळपिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरेकेंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ. सुजितकुमार सिंह व सहसंचालक संकेत कुलकर्णीविभागीय आयुक्त सौरभ रावजमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगमपोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशमपुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमारपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालजिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटीलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादआरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटीलससून चे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबेवैद्यकीय सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन खासदार शरद पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले,  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतातही गंभीर बाब आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावाअशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.

            श्री. पवार म्हणालेमॉलबसस्थानकरेल्वे स्थानकमोठी दुकाने याठिकाण च्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी बंधनकारक करावी. बांधून तयार असणाऱ्या इमारतींचा उपयोग कोविड उपचार केंद्रासाठी करता येऊ शकेलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणालेदेशात सर्वात जास्त रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग पुण्यात आहेही चिंतेची बाब आहे. पुण्यातील रुग्णदर व रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र व्यवस्थापनशासकीयखाजगी व जम्बो हॉस्पिटलचे प्रभावी व्यवस्थापन याबरोबरच जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचे संदेशपर व्हिडीओ सोशल माध्यमातून प्रसारित करावेतजेणेकरून लोकांमधील भीती कमी होईल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित असून  नागरिकांनी समाजात वावरताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांकडून पोलीस विभागाने दंड वसूल करावा,असेही त्यांनी सांगितले.

 

 

            आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, 'माझे कुटुंब माझी जबाबदारीही मोहीम राज्यात 15 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे. विविध पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यात लोकप्रतिनिधीनगरसेवकस्वयंसेवी संस्था व नागरिकांचा सहभागदेखील महत्वाचा आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी बेड अडविला जाणार नाहीयाची दक्षता घ्यावी. रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णाच्या तब्बेतीची माहिती नातेवाईकांना समजावीयादृष्टीने रुग्णालयांनी खबरदारी घ्यावीअसे सांगून राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून सहकार्य मिळावेअशी अपेक्षा श्री टोपे यांनी व्यक्त केली.

             डॉ. सुजित सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या..

            विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील आजवरचे बाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यू दरतपासण्यांची संख्याप्लाझ्मा थेरपी तसेच कोरोना व्यवस्थापनाच्या दृष्टीने पुढील नियोजनाबाबत माहिती दिली.

            पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लवकर निदान होऊन रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने तपासण्या वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

000000


‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करण्याबाबत जनजागृती करावी-केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर














पुणे, दि. 5:- पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्कचा नियमित वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिले.

       पुण्यातील विधान भवन सभागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.

बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ अमोल कोल्हे, आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप मोहिते-पाटील, सिध्दार्थ शिरोळे, अशोक पवार, ॲड राहुल कुल, संजय जगताप, सुनील शेळके, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, केंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ. सुजितकुमार सिंह व सहसंचालक संकेत कुलकर्णी, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ कुणाल खेमनार, पोलीस अधिक्षक संदीप पाटील आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

          केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व खासदार शरद पवार यांनी शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेवून लोकप्रतिनिधींच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी केंद्रीय मंत्री श्री जावडेकर म्हणाले, नागरिकांमध्ये ‘कोरोना’ विषाणूची भीती कमी करण्याची गरज आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती डॅशबोर्डवर अद्ययावत करावी. कोरोनाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचनाही केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री जावडेकर यांनी दिल्या.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दृक श्राव्यप्रणालीद्वारे बैठकीत भाग घेवून सूचना केल्या. यावेळी त्या म्हणाल्या, जम्बो कोवीड रुग्णालयातील उपचारांबाबतची माहिती नागरिकांना मिळावी, खाजगी रुग्णालयांमध्ये महापौरांनी दर आठवड्यात चार रुग्णालयाची कामकाजाची माहिती घेवून चित्रफीत सादरीकरण करावी. याचप्रमाणे खासदार आमदार यांसह एक महिन्याची मोहिम राबवावी. याचा आरोग्य सेवेला फायदा होईल. नागरिकांमध्यील अफवा, गैरसमज दूर होवून वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

      उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधांना कोरोनाच्या काळात कोणत्या यंत्रणेकडे कोणती जबाबदारी दिली आहे याबाबत माहिती द्या. कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्यासाठी मानधन तत्वावर नियुक्ती करा. मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची मोहिम अतिप्रभावी करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी केल्या.

      आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मेगाभरती अंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छानणी करुन कायमस्वरुपी रिक्त पदाची भरती प्रकिया सुरु आहे. कोविडच्या अनुषंगाने तात्पुरती मनुष्यबळांची भरती करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी टेली-एक्सरे सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे. नागरिकांची आरोग्य सुविधा वेळेत मिळव्यात यासाठी 50 टक्के नवीन रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी दिली.

        कोरोना रुग्णाला उपचारांती खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या देयकांचे लेखापरीक्षण करा. यामध्ये ऑक्सिजन दर, पीपीई संच इत्यांदी बाबी शासनाच्या परिपत्रकान्वये आकारणी केली आहे का ? त्यांची तपासणी करा. ऑक्सिजनच्या पुरवठ्याध्ये तुटवडा होणार नाही याबाबत विशेष लक्ष द्या. डॅशबोर्डवर नागरिकांना मार्गदर्शन मिळावे याबाबत नोंद घेवून कार्यवाही करा. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोविड-19 च्या अनुषंगाने 20 पॅकेजसाठी खासगी रुग्णालयाने मोफत उपचार करण्याची तरतूद आहे त्याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार झालेच पाहिजे. याचे उल्लघंन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर दंड आकारणी करा, अशा सूचना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिल्या. 

खासदार श्री पवार म्हणाले, कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्यासाठी मानधन तत्वावर नियुक्ती कराव्यात अशी सूचना केली.

        खासदार श्री बापट नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सोई-सुविधा देण्यासाठी तसेच रुग्णवाहिका तात्काळ होण्यासाठी उच्चस्तरीय समन्वय यंत्रणा उभी करावी अशी सूचना केली.

        खासदार श्री बारणे यांनी खासगी रुग्णालयाच्या बाबत प्राप्त तक्रारीची गांर्भीयाने दखल घ्यावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या स्थितीबाबत माहिती देण्याची सूचना केल्या.

      खासदार डॉ कोल्हे यांनी ग्रामीण भागातील रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी. ॲटीजेन चाचणी केल्यानंतर केल्यानंतर लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कांतील व्यक्तींचे लगेच शोध घेवून पुढील वैद्यकीय कार्यवाही करण्याची सूचना केली.

खासदार वंदना चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयाप्रमाणे खासगी रुग्णालय, प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषयक चाचण्या रात्री कराव्यात. नागरिकांना डॅशबोर्डवर तसेच समाज माध्यमातून अद्ययावत माहिती देण्याच्या सूचना केल्या. 

     आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप मोहिते-पाटील, सिध्दार्थ शिरोळे, अशोक पवार, ॲड राहुल कुल, संजय जगताप, सुनील शेळके, अण्णा बनसोडे, महेश लांडगे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

**