Thursday, October 31, 2019

राष्ट्रीय एकता दौडला पुणे विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद


पुणेदि. 31 (विमाका): सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडला (रन फॉर युनिटी) पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. पुणे विभागातील पुणेसातारा व सोलापूर या तिनही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता दौडमध्ये संबंधित जिल्ह्यातील खेळाडूसामाजिक संस्थांचे प्रतिनिधीशासकीय अधिकारीकर्मचारीविद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पुणे जिल्हा- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित 'रन फॉर युनिटीराष्ट्रीय एकता दौड मध्ये विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम सहभागी झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल व स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांना 'राष्ट्रीय एकता दिवस शपथदिली. त्यानंतर कौन्सिल हॉल ते साधू वासवानी चौक- अलंकार चौक- जनरल वैद्य मार्गे पुन्हा कौन्सिल हॉल परिसर या मार्गाने एकता दौड संपन्न झाली. या एकता  दौड मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधवउपायुक्त संजयसिंह चव्हाणउपायुक्त चंद्रकांत गुडेवारअपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाडजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगेजिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतानउपवनसंरक्षक श्री नाईकडेउपविभागीय अधिकारी संतोष देशमुखनेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकरतहसीलदार अर्चना निकम यांच्यासह जिल्ह्यातील खेळाडूक्रीडाप्रेमीसामाजिक संस्थांचे प्रतिनिधीविद्यार्थी तसेच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारीकर्मचारी सहभागी झाले.
सातारा‍ जिल्हा - एकता काय करु शकतेकिती प्रचंड ताकद एकतेमध्ये असते याचे महत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी समाजाला पटवून दिले आहेत्यांचे आदर्श विचार पुढच्यापिढीपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज असून त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास समाजाची आणखीन प्रगती होऊ शकतेअसा विश्वास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या  जयंतीनिमित्त जिल्हाप्रशासनाकडून  'रनफॉर युनिटी' अर्थात एकता दौड आयोजित  करण्यात आली. या एकता दौडला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून   या एकता दौडीचा प्रारं केला. यावेळी त्या बोलत होत्या. या एकता दौडला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेप्रांताधिकारी मिनाज मुल्लालाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उप अधिक्षक अशोक शिर्केजिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीकर्मचारीविविध संस्थांचे पदाधिकारीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
31 ऑक्टोंबर सरदार वल्लभाई पटेल यां जयंती दिवस. या दिवसानिमित्त आज महाराष्ट्रभर एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभाई पटेल यांनी एकतेचे महत्व तर समाजाला पटवून एकतेची संकल्पना समाजाला दिली आहे. त्यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणून  त्यांच्या विचारानुसार आदर्श समाज घडवूयाअसे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले.
* लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे फलक ठरले एकता दौडेतील आकर्षणभ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रलाच देणे व घेणे हा गुन्हा आहेलाच मागितल्यास तक्रार कुठे करावयाची यासह अनेक विविध फलक घेऊन लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारीकर्मचारी या एकता दौडमध्ये सामील झाले होते हे फलक एकता दौडमधले आकर्षण ठरत होते.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात आठडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे या विषयी शाळामहाविद्यालयांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळामहाविद्यालयांमध्ये एकतेची शपथ देणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यावेळी सांगितले.
         सकाळी 8 वाजता निघालेली एकता दौड ही पोवईनाका-पोलीस अधीक्षक कार्यालय - शेटे चौक-कमानी हौद-पोलीस करणुक केंद्र-नगरपालिका- जिल्हा वाहतुक शाखा रविवार पेठ अशी आयोजित करण्यात आली होती.
सोलापूर‍ जिल्हा- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित  एकता दौडला (रन फॉर युनिटी) सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षी सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येते. 
जिल्हा प्रशासनपोलीस विभागकेंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांच्या लोकसंपर्क कार्यालयतर्फे  या दौडचे आयोजन करण्यात आले होते.
एकता दौडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चार पुतळा चौक येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिरवा ध्वज दाखवून दौडला सुरवात केली. त्याअगोदर त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारीनागरिक यांना एकतेची शपथ दिली.
यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदेमहापालिका आयुक्त दीपक तावरेपोलीस अधीक्षक मनोज पाटीलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळनिवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुखक्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाणशिक्षण अधिकारी संजय राठोडराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक चंद्रकांत बरडे उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव  आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
एकतेची शपथ दिल्यानंतर दौड व्हिआयपी रोडमार्गे डफरीन चौक ते एम्प्लॉयमेंट चौक ते सात रस्ता  या मार्गे शासकीय विश्रामग्रह येथे आली. तिथेच दौडचा  समारोप झाला.

दौडमध्ये राज्य राखीव बलचे असिस्टंट कमांडट बंडगरसोलापूर रनर्स असोसिएशनचे डॉ. सत्यजीत वाघचवरे, सोलापूर ॲथलॅटीक्स असोसिएशनचे राजू प्याटी, टेनिस असोसिएशनचे सचिव राजीव देसाई, एनएचआयचे व्यवस्थापक अनिल विपतक्रीडा कार्यालयाचे नदीम शेखवन विभागाच्या संध्याराणी बंडगरमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सचिव अविनाश गोडसेमहाराष्ट्र बटालियनचे वसंत जाधवशहाजी पाटील आदी सहभागी झाले.
दौडमध्ये लहान मुलांसह युवक-युवतीपोलीस अधिकारी-कर्मचारीमहसूलक्रीडामहानगरपालिका आदी विभागातील अधिकारी- कर्मचारी  उत्साहाने  सहभागी झाले होते.
0000



Tuesday, October 1, 2019

यंदाची निवडणूक पर्यावरण स्नेही निवडणूक - डॉ. दीपक म्हैसेकर




पुणे दि. 1: यंदाची निवडणूक पर्यावरण स्नेही निवडणूक म्हणून केंद्रीय आयोगाने जाहीर केली असून त्यामुळेच प्लॅस्टिकचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये असे आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केले.
पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या राज्यभरातील अंशकालीन वार्ताहरांच्या राज्यव्यापी कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणीच्या प्रधान महानिदेशक इरा जोशी होत्या.
 डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आपल्या भाषणात प्रामुख्यानं आदर्श आचारसंहितेबद्दलची सविस्तर माहिती दिली. अस्तित्वात असलेल्या कायद्याचे तंतोतंत पालन म्हणजेच आदर्श आचारसंहिता असल्याचे सांगत ते पुढे म्‍हणाले, निष्पक्षपाती म्‍हणजे कोणत्‍याही पक्षाला अधिकचा फायदा न मिळता सर्वांना समान संधी. निवडणूक आचारसंहि‍ता काळात राजकीय पक्ष, प्रसारमाध्‍यम अशा सर्वांवरच बंधने असतात. कोणालाही अवाजवी स्‍वातंत्र्य मि‍ळू नये, अशीच या मागची स्‍वच्‍छ भूमिका असते. आचारसंहितेच्‍या अंमलबजावणीचे काही टप्‍प्‍ो असतात. त्‍यानुसार त्‍याची अंमलबजावणी केली जाते आणि या आचारसंहितेंचा भंग करणाऱ्या वि‍रूध्द आवश्‍यक त्‍या कायद्यानुसार गुन्‍हेही दाखल केले जातात. 
निवडणूक काळात आकाशवाणीच्या वार्ताहरानीं निःपक्षपातीपणे वार्तांकन करावे अशी अपेक्षा इरा जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी पुणे आकाशवाणी केंद्राचे उपमहानिर्देशक आशिष भटनागर, उप निर्देशक गोपाल आवटी आणि वृत्त विभागाचे प्रमुख नितीन केळकर यांनीही मार्गदर्शन केले. 
या कार्यशाळेला राज्यभरातील आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****







विभागीय आयुक्तांनी दिली “सिंगल यूज प्लास्टीक बंदी”ची शपथ पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टीक बंदी आवश्यक –डॉ. दीपक म्हैसेकर



पुणे दि. 1 : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेंतर्गत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सिंगल यूज प्लास्टीक बंदीची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सिंगल यूज प्लास्टीक बंदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त(सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपायुक्त (करमणूक) जयंत पिंपळगावकर, उपायुक्त (पंचायत) चंद्रकांत गुडेवार, नगर पालिका प्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, देशभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत जोरदार काम सुरू आहे. पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिकचे विपरीत परिणाम मनुष्यासह प्राणी व पक्षांवर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या प्लास्टिकच्या विळख्यातून आपल्याला वसुंधरेचे रक्षण करावयाचे आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच प्लास्टीकवर बंदी आणली आहे. याची आपल्याला प्रभावी अंमलबजावणी करावयाची असून या कामात नागरिकांना सहभागी करून घेण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशांत खांडकेकर यांनी सिंगल यूज प्लास्टिकच्या दुष्परिणामाबरोबरच ही मोहिम राबविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावयाचे असल्याचे सांगितले.
यावेळी प्लास्टीच्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबाबतची चित्रफित दाखविण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रशानातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******