Tuesday, December 18, 2018

नवभारताच्या निर्माणात पुण्यासह महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी










प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुणे मेट्रो लाईन-३चे शानदार भूमीपूजन
पुणे दि. 18 (विमाका)पायाभूत सुविधांबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला मेट्रो रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार असल्याने भविष्यात हे शहर जागतिक स्तरावर ओळखले जाईल. मेट्रो देशातील शहरांची जीवन वाहिनी बनत असून ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असणार आहे. या नवभारताच्या निर्माणात महाराष्ट्र आणि पुण्याचे मोठे योगदान असेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो लाईन-३चे भूमीपूजन आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चेविद्यासागर रावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरकेंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरीपालकमंत्री गिरीश बापटसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकपिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधवखासदार अनिल शिरोळेपीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणालेपुणे शहराची ओळख सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर अशी असून माहिती तंत्रज्ञानच्या क्षेत्रातही पुण्याने मोठी प्रगती केली आहेहिंजवडी हे माहिती तंत्रज्ञानाचे हब असून या‍‍ ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी देशाला नवी ओळख दिली आहेया ठिकाणी होत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे या ठिकाणी काम करत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहेया मेट्रो मार्गामुळे वाहतुकीचा आणि प्रगतीचा वेग वाढणार आहे.
पुण्यातील पहिल्या दोन टप्प्यातील मेट्रोचे काम वेगाने सुरू असून पुढच्यावर्षी १२ किलोमीटरपर्यंत मेट्रो पुण्यात धावेलपायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्राचे आणि राज्याचे विशेष लक्ष आहेदेशातील गावे-शहरे एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहेदेशाच्या कोणत्याही भागात फिरताना या कामाचा वेग सहज लक्षात येईल.
विकासाच्या महामार्गापासून कोणीही वंचित राहू इच्छित नाहीत्यासाठी देशभरातील अनेक शहरांतून मेट्रोचे प्रस्ताव केंद्राकडे आले आहेतदेशात ५०० किलोमीटरचे मेट्रोचे काम पूर्ण झाले असून ६५० किलोमीटरचे काम प्रगतीपथावर आहेअटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मेट्रोची सुरूवात झाली.त्यांच्या काळातच दिल्लीच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले.
गावांपासून शहरांपर्यंत पायाभूत सुविधांवर भर देण्याचे सरकारचे धोरण आहेसार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरणाचा पुरस्कार केंद्राने केला असून त्यामाध्यमातून देशातील पहिला मेट्रो प्रकल्प पुण्यात साकारत आहेया नव्या धोरणामुळे मेट्रोच्या विकासाला गती मिळणार आहेमेट्रो-रेल्वेचे चांगले धोरण केंद्र सरकारने विकसीत केले असून केंद्राच्या आणि राज्याच्या व्यापक दृष्टीचा हा परिणाम आहे.
इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ डुईंग हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे सांगत श्रीमोदी पुढे म्हणालेपुण्यासह महाराष्ट्रातील ९ शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत १५०० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून ३५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेतत्याच बरोबर देशात स्वच्छता आणि गरिबांना घरे देण्याबाबत मोठे काम सूरू असून रस्तेवीज आणि पाणी यांच्याशी निगडीत अनेक प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य लोकांना सरकारच्या सेवा वेगाने आणि चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी डिजीटल इंडियाचे काम सुरु आहेया माध्यमातून देशातील गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जात आहेत. लोकांसाठी सोपे आणि सुलभ नियम बनिवण्याचे सरकारचे धोरण आहेनवे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यात स्वस्त मोबाईल आणि स्वस्त इंटरनेट डेटाचा मोठा वाटा आहेजगातला सर्वाधिक मोबाईल बनविणारा दुसरा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने गेल्या साडेचार वर्षात डिजीटल व्यवहार सहा पटीने वाढले आहेतयामुळे लोकांच्या रोजच्या गरजा वेगाने पूर्ण होत आहेतहार्डवेअर बरोबरच स्वस्त इंटरनेट डेटा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहेत्याचबरोबर महाराष्ट्रात १ लाख एलईडी पदपथ दिवे लावण्याचे काम पूर्ण झाले असून या माध्यमातून मोठी विजेची बचत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.  
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याकरिता अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आज होत आहे. हा सर्वांकरिता आनंदाचा क्षण आहे. आयटी हब असलेले हिंजवडी जगाला मानव संसाधन पुरवते. याच ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची निर्मिती केली जाते. हा भाग शिवाजीनगरशी मेट्रोच्या माध्यमातून जोडल्या गेल्यामुळे प्रगतीचे नवे दालन खुले झाले आहे. आयटी पार्कमध्ये लाखो लोक कामाच्या निमित्ताने येतात. प्रवासामध्ये त्यांचा वेळ जातो. त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
केंद्राच्या नव्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या या नव्या धोरणानुसार सर्वात पहिला मेट्रोचा प्रकल्प पुण्यात होत आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. तसेच वेळेचे बचत होऊन गतिमानता आणि कार्यक्षमता वाढून देशाचा विकास होईल. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील तसेच देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुणे  नावलौकिक मिळवेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण (पीएमआरडीए)चे क्षेत्र महाराष्ट्रातील विकासाचे क्षेत्र होईल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागात सुरु करण्यात येणाऱ्या रिंग रोड, हायटेक सिटी, इलेक्ट्रिक बसेस आदी प्रकल्पांचा उल्लेख केला.  पीएमआरडीएच्या माध्यमातून तसेच लोकांच्या सहकार्यातून  या भागाचा सुनियोजित विकास साधण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणालेपुणे शहराबरोबर माझा जवळचा संबंध राहिला आहेराज्यातीलच नव्हे तर देशातले सर्वात प्रगतशील शहर म्हणून पुण्याचा विकास होत आहेपुणे ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी आहेस्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चांगले सुरू आहे.
पालकमंत्री गिरीश बापट  म्हणालेकमी कालावधीत पुण्यात मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहेपुणे मेट्रो लाईन-३ मुळे हिंजवडीच्या आयटी पार्क मधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनां मोठा लाभ होणार आहेया मेट्रोच्या कामामुळे प्रवासाला गती मिळणार आहेहिंजवडी मेट्रोचा विस्तार वाढत राहणार असून शिवाजीनगर पर्यंतची ही मेट्रो हडपसर पर्यंत नेण्याची आवश्यकता आहेपुण्याच्या विकासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी पुणे शहरासाठी आला आहेस्मार्ट सिटीजायकामेट्रो यांसारखे मोठे प्रकल्पाबरोबर १६ हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्गाची कामे होणार आहेतलोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबरोबच पुरंदर येथील विमानतळाच्या कामालाही गती मिळत आहे
****

No comments:

Post a Comment