जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा व्हावा
-विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे दि.१९: दूध, धान्य, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तुंचा
पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत
ठेवण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त
कार्यालयात आयोजित अन्न, नागरी पुरवठा विभाग, पणन विभाग, दुग्ध विभागाच्या
प्रशासकीय अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली
झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
ते म्हणाले, सध्याच्या
परिस्थितीत कोरेाना विषाणूचा उद्रेक झाल्यामूळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा व
जीवनावश्यक वस्तूजादा दराने विक्री
होण्याची शक्यता नाकरता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेवून जनतेचे दैनंदिन जनजीवन
सुरळीत सुरु राहण्यासाठी जीवनावश्यक वस्तूसुरळीत व रास्त भावात उपलब्ध होणे गरजेचे
आहे. पणन विभागाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियंत्रण
ठेवावे. दूध, धान्य, भाजीपाला, तुरडाळ, कांदा, बटाटा, लसूण आदी जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे
नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले जीवनावश्यक
वस्तुंबरोबरच अन्न व प्रशासन विभागाने बाजारात श्वसनासंबंधी आजारांवरील औषधांचा
तुटवडा भासणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.
बैठकीस पणन विभागाचे
संचालक सुनील पवार, सहसंचालक विनायक कोकरे, अन्न विभागाचे सहआयुक्त एस.एस देशमुख,
औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस.बी. पाटील, सहायक पुरवठा अधिकारी सुनंदा भोसले- पाटील
उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment