मुंबई, दि 27 :- "ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतीशील विचारवंत हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात, समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. 'मुक्तांगण'च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केले. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचे कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले. वैद्यकीय तज्ज्ञ, पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता असे बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या, 'मुक्तांगण' परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे.
0000
No comments:
Post a Comment