Wednesday, January 9, 2019

खेलो इंडीया २०१९ चे शानदार उद्घाटन औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

खेलो इंडीया २०१९ चे शानदार उद्घाटन
औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

·         डोळ्याचे पारणे फेडणारा रंगारंग कार्यक्रम सव्वातास चालल्याने उपस्थितांमध्ये उत्साह वाढला
·         नीटनेटके आणि उत्साहपूर्ण आयोजन
·         रंगारंग कार्यक्रमाच्या प्रारंभीच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तुत्वाची झलक दाखविण्यात आली
·         संपूर्ण देशातून खेळाडू आल्याने खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले
·         लहान मुलांच्या कलागुणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय क्रीडा मंत्री रावर्धनसिंग राठोड व अन्य मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

पुणे दि : युवकांसाठी खेलो इंडीया स्पर्धेचे आयोजन करून केंद्र सरकार स्वामी विवेकानदांच्या सुदृढ भारत निर्माणाचा मंत्र आचरणात आणत आहेतीच प्रेरणा घेवून क्रीडा क्षेत्रातमहाराष्ट्राचे नाव उंचाविण्यासाठी औंरगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये दुसऱ्या खेलो इंडीया २०१९ स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी श्री फडणवीस बोलतहोतेयावेळी केंद्रिय क्रीडा  युवक कल्याण मंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोडपालकमंत्री गिरीश बापटक्रीडा मंत्री विनोद तावडेसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेखासदार अनिलशिरोळेआंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुशील कुमारस्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडीयाच्या महासंचालक नीलम कपूरक्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाकेंद्राचे क्रीडा सचिव राहूलभटनागरसाईचे उपमहासंचालक संदीप प्रधान उपस्थित होते.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्रात खेलो इंडियाचे आयोजन केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारी आहेस्वामी विवेकानंद युवकांना म्हणाले होते मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानावर जाऊन खेळाज्या प्रमाणे देवाला सुकलेली फुले चालत नाहीतत्याच प्रमाणे तंदुरूस्त नसलेले युवक मातृभूमीला चालत नाहीतसुदृढ युवकांच्या माध्यमातून स्वस्थ भारताच्या निर्माणाचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न होते.
स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीचे आचरण सरकार करत आहेत्यामाध्यमातून खेलो इंडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेयामुळे युवा खेळाडूंना चांगला मंच मिळाला आहेया स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिभाशाली खेळाडू घडतील.
केंद्राच्या धर्तीवरच राज्य शासनानेही क्रीडा क्षेत्रात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेतपूर्वी तालुकास्तरावर क्रीडा मैदानाच्या उभारणीसाठी १ कोटी रुपये दिले जात होतेती रक्कम आता ५ कोटी रूपये केली आहेतर विभागस्तरावरील मैदानासाठी २४ कोटी रूपयांच्या ऐवजी ४५ कोटी रूपये दिले जात आहेतक्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठीच राज्य शासनाने ही पाऊले उचलली आहेत.
खेळात हार जीत तर होत असते असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेय यांची ना हार मैना जीत मै ही कविता उध्दगृत केलीतसेच खेळात हार जीतपेक्षा खेळाची उर्मी असणे आवश्यक आहेहारू तर पुन्हा जिंकूजिंकू तर पुन्हा पुढे जावू आणि पुढे जावू तर देशाचे नाव पुढे जाईल असे सांगत देशाचा तिरंगा उचावण्यासाठी खेळण्याचे आवाहन त्यांनी खेळाडूंना यावेळी केले.




No comments:

Post a Comment