खेलो इंडीया स्पर्धेतून ऑलंपिक विजेते तयार होतील – राजवर्धनसिंग राठोड
कर्नल राजवर्धनसिंग राठोड म्हणाले, खेळासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे स्वागत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांच्या मार्गदर्शनामुळे या दुसऱ्या खेलोइंडीया क्रीडा स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही मनापासून आभारी आहे. पुढच्या दहा दिवसात येथे होणाऱ्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपणहोणार असून या नव्या चॅम्पिअनला सर्व देश पाहणार आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. येथील विजेत्या खेळाडूंतून ऑलंपिकविजेते तयार होतील. खेळाच्या मैदानात मिळणारे शिक्षण कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. आजची पिढी मजबूत होण्यासाठी युवकांनी खेळण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश केंद्राचे क्रीडा सचिव राहूल भटनागर यांनी वाचून दाखविला. खेलो इंडीयाच्या “जय आणि विजय” या दोन्ही शुभंकरांनी मैदानात फेरी मारली.यावेळी खेळाडूंनी देशभराच्या प्रमुख शहरांची यात्रा करून आलेल्या खेलो इंडीयाची ज्योत मान्यवरांच्या हाती दिली. यावेळी केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी उपस्थितांना खेळा विषयी एकनिष्ठराहण्याची शपथ दिली.
No comments:
Post a Comment