Friday, June 10, 2022

केंद्राच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सातारा जिल्ह्याचा गौरव · राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

 

 

 

            मुंबईदि. 10 : केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा 2020-21’ मध्ये सातारा जिल्ह्याला उल्लेखनीय कार्यासाठी दिल्ली येथे उत्कृष्टता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आल्याने कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाचेकौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अभिनंदन केले आहे. सातारा जिल्हा कौशल्य नियोजन आराखड्यात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या पुढच्या काळात सातारा जिल्हा अव्वल दर्जाची कामगिरी करेलअसा विश्वासही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

            उत्कृष्टता पुरस्कार श्रेणीत निवड झालेल्या देशातील 8 जिल्ह्यांमध्ये सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे. कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्यशासनाच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कोविड काळात कार्यरत असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील जवळपास एक हजार  कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. साहसी खेळग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री म्हणून वेळोवेळी आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. कोविडमुळे विधवा झालेल्या भगिनी आणि कातकरी समाजातील लोकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या या कामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.  सातारा जिल्ह्याचा झालेला सन्मान जिल्हा प्रशासनाला प्रोत्साहन देणार आहेअसे राज्यमंत्री श्री.देसाई यावेळी म्हणाले. केंद्रीयस्तरावर सन्मान झालेल्या वाशिमसिंधुदुर्गठाणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाचेही यावेळी त्यांनी अभिनंदन केले.

                दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात  मंत्रालयाचे सचिव  राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’ (२०२०-२१) पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्ह्यांतून निवडल्या गेलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी  दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.

००००




No comments:

Post a Comment