Wednesday, April 19, 2017

भारतीय संस्कृती व संस्काराचे श्री श्री रविशंकर हे राजदूत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




भारतीय संस्कृती व संस्काराचे
श्री श्री रविशंकर हे राजदूत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. १९ (विमाका): जगभरात भारताच्या विचाराला, जीवनपध्दतीला, संस्कृतीला, योगाला श्री श्री रविशंकर यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली,ते खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या विचारांचे आणि संस्कारांचे राजदूत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
            पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलेत्यावेळी मुख्यमंत्री बोलत होतेयावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर,पालकमंत्री गिरीश बापटऑल जर्नालिस्ट असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरेप्रदेशाध्यक्ष राजा मानेज्येष्ठ संपादक दिनकर रायकर वसंत मुंढेविजय बाविस्करगोंविंद घोळवेमंदार फणसेकिरण जोशी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणालेस्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांच्या सामर्थ्यावर जगावर विजय मिळवलात्यांनी पहिल्यांदा आपल्या देशाच्या महान संस्कृतीचे दर्शन जगातील मान्यवरांना शिकागो येथे झालेल्या धर्मपरिषदेत घडवून आणलेत्यानंतर दिल्ली येथे रविशंकर यांनी जगभरातील धार्मिक गुरुंचा एकत्रित कार्यक्रम घेवून वसुधैवं कुटुंबकमंचा अविष्कार जगाला दाखवून दिलास्वामी विवेकांनदांच्या विचारांचा अविष्कार गुरूजींनी सर्वांसमोर मांडलाचारित्र्य संपन्नवैचारिक बैठकीचे अधिष्ठान असलेले नेतृत्व सर्व क्षेत्रात असणे आवश्यक आहेगुरुजींच्या विचारांच्या माध्यमातून हे घडत आहेस्वामी विवेकानंदांचे विचार गुरूजींनी प्रकट रुपाने आपल्या समोर मांडले आहेतयाच विचारांतून देशाचे नवीन भविष्य घडणार आहे.
‘जलयुक्त शिवार’ला आर्ट ऑफ लिव्हिंगची साथ
            आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्ययमातून अध्यात्माबरोबरच इतर आठ क्षेत्रात गुरुजींचे मोठे कार्य आहेदेशाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी त्यांचे कार्य  सुरु असून, राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातही आर्ट ऑफ लिव्हिंगची मोलाची साथ आहेवैज्ञानिक पध्दतीने जलयुक्त शिवारची कामे ही संस्था करत आहेराज्यातील शेतकऱ्यांची आवश्यकता समजून घेवून काम करण्याची गरज आहेकर्जमाफी आणि कर्जमुक्ती हा केवळ एकच उपाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचा नाहीतर शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मंत्र देण्याची आवश्यकता आहेत्यासाठी राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहेयामुळे राज्याचा कृषीचा‍ विकासदर साडे बारा टक्क्यांवर गेला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्तव्य भावनेतूनच कायदा केला
            पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेलोकशाहीला मजबूत करण्यासाठी पत्रकारांना संरक्षण देणे सरकारचे काम आहेपत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा केला हा कर्तव्य भावनेतूनच केला आहेलोकशाहीला अधिक प्रकल्भ करण्याचे काम पत्रकारिता करत असतेत्यामुळे लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
सेवा भावनेतूनच लाल दिवा काढला
            पंतप्रधानांनी देशातील व्हीआयपी संस्कृती संपविण्यासाठीच मंत्र्यांसह मान्यवरांच्या गाड्यांवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय घेतलाहा निर्णय हा अत्यंत चांगला असून लोकप्रतिनिधी हे समाजाचे सेवक असतातमी ही स्वता:ला समाजाचा सेवकच मानतोयाच सेवाभावातूनच आजच माझ्या गाडीवरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेवून त्यांची तातडीने अंमलबजावणी केली आहेयापुढेही याच सेवाभावाने काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
            श्री श्री रविशंकर म्हणालेसर्वांनी एकत्र येवून काम केले तरच सर्व समाज पुढे जाईलप्रत्येकाने आपल्या जीवनाचा सन्मान करणे हेच खरे अध्यात्म आहेकोणत्याही परिस्थितीत सत्याची साथ देणे हे पत्रकारांचे काम आहेमात्र हे करत असताना विकास पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहेसमाजात सुरू असणाऱ्या चांगल्या गोष्टी पत्रकारांनी समाजासमोर मांडाव्यातसत्याला समोर ठेवताना समाजाला प्रेरणा देण्याचे काम पत्रकारांनी करणे अभिप्रेत आहेमहाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानाची कल्पनाही अत्यंत चांगली असून लोकसहभागामुळेच ती यशस्वी झाली आहे. अध्यात्मात सांगितलेल्या नेत्यांच्या अंगातील सर्व गुण देवेंद्र फडणवीस यांच्या अंगी असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले.
            पालकमंत्री गिरीश बापट म्हणालेपत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहेसमाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतातत्यामुळे लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला संरक्षण देणे हे शासनाचे काम आहेपत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला असतोराज्य शासनाने नव्याने आणलेल्या कायद्यामुळे राज्यातील पत्रकारांवरील हल्ले थांबण्यास मदत होणार आहे.
            श्री श्री रविशंकर यांना मानपत्रस्मृतीचिन्हशालफेटा देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने लोकमतचे समुह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आलात्याच बरोबर यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार म्हणून सत्कार करण्यात आलातसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
            यावेळी राजा मानेअशोक वानखेडे यांनी मनोगते व्यक्त केलीकार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय भोकरे यांनी केलेतर आभार नितीन बिबवे यांनी मानले.
****

No comments:

Post a Comment