Saturday, February 18, 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज ...जिल्हाधिकारी सौरभ राव

·                  मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर
·                  जि.प.निवडणुकीबाबत आकाशवाणीवर मुलाखत

       पुणे दि. 18 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती  निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा जिल्हा प्रशासनाचा भर आहे,त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्मपध्दतीने नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
      आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांची मुलाखत नुकतीच प्रसारित झाली. या मुलाखतीत श्री. राव यांनी ही माहिती दिली. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली. आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी ज्योत्स्ना केतकर यांनी मुलाखतीचे संयोजन केले. या मुलाखतीसाठी निवडणूक समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
           जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले की, ‘ भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क दिला आहे. हा हक्क नागरिकाने बजावयाला हवा त्यासाठी प्रशासन मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम राबवत आहे. मतदारांनी निर्भीड आणि निपक्षपणे मतदान करावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विविध समित्या आणि गटांची नियुक्ती करण्यात आली आहे.
      जिल्हाधिकारी राव म्हणाले, ‘ पुणे जिल्हा परिषदेच्या 75 गटांसाठी आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समितींच्या  150 गणांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी  सुमारे 28 लाख मतदार आहेत. हवेली तालुक्यात सर्वाधिक मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तेरा तालुक्यांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे  13 निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसिलदार दर्जाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. याचबरोबर जिल्हास्तरावर निवडणूक संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याचबरोबर आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाकडे नागरिक आचारसंहिता भंगाबाबत तक्रार नोंदवू शकतात. निवडणूक योग्य व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी आचारसंहिता कक्ष, एक खिडकी कक्ष, आराखडा कक्ष, मतदार मदत केंद्र, वाहतुक व्यवस्थापक कक्ष, वाहन अधिग्रहण समिती, निवडणूक निरिक्षण कक्ष, इ.व्हि.एम.मॅनेजमेंट कक्ष, प्रसार माध्यम कक्ष, पेड न्युज कमिटी स्थापन करण्यात आली आहे. मतदानासाठी जवळपास 10 हजार इ.व्हि.एम. उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच सुमारे 500 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
             आचारसंहिता भंगाची तक्रार आल्यास त्याबाबत तत्काळ कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगून श्री.राव म्हणाले कीनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर सर्व राजकीय पक्षांची बैठक घेऊन आचारसंहिताच्या तरतूदीबाबत कल्पना देण्यात आली आहे. त्याचबरोबर शासकीय यंत्रणांनी काय पध्दतीने काम करावे यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कक्ष अहोरात्र सुरु ठेवण्यात येणार असून या पथकात महसूलपोलीस आणि अन्य विभागाचे अधिकारीकर्मचारी यांचा समावेश आहे. संवेदनशिल मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून तेथे आवश्यक सुरक्षा बल नेमण्यात आले आहे.
       जिल्ह्यात एकूण 3369 मतदान केंद्र आहेत. सर्व केंद्रावर पिण्याचे पाणीवीजपुरवठासुरक्षा भिंत शौचालय आदी बाबींची सुविधा असल्याची खात्री करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सौरभ रांव यांनी सांगितले.
      राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूकीत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला आहे. ट्रू व्होटरच्या सहाय्याने मतदार आपले मतदार यादीतील नांव शोधू शकतो. त्याचबरोबर तरुण मतदारांनी मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत आहेअशी माहिती श्री. सौरभ राव यांनी दिली.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. उमेदवारांच्या अर्जातील माहितीच्या आधारे फ्लेक्स तयार करुन मतदान केंद्राबाहेर लावली जाणार आहे. त्यामूळे मतदाराला उमेदवाराच्या बाबत नीट माहिती मिळू शकेलअसेही  श्री.सौरभ राव यांनी सांगितले. या निवडणूकीत आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. याद्वारे मतदारांनी मतदानाकडे आकर्षित व्हावे असे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
                                                                                0000

No comments:

Post a Comment