Thursday, March 2, 2017

अबुधाबीच्या शिष्टमंडळाने जाणून घेतली राज्यातील गुंतवणुकीची संधी


पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी
अबुधाबी व राज्य शासन यांच्यात समिती स्थापणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 2 : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथरिटी इच्छुक असून त्यासंदर्भात या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक प्रत्यक्ष यावी यासाठी राज्य शासन व ऑथरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त कार्य समिती स्थापन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
            राज्यातील पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधींची माहिती घेण्यासाठी अबुधाबी इनव्हेस्टमेंट ऑथरिटीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात ऑथरिटीच्या प्रायव्हेट इक्विटी विभागाचे कार्यकारी संचालक हमद शाहवान अल धाहेरीइंटरनल इक्विटी विभागाचे कार्यकारी संचालक मोहम्मद अल क्वामझीमालमत्ता आणि पायाभूत सुविधा विभागाचे कार्यकारी संचालक खादीम अल रुमैथी,इक्विटी स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग विभागाचे प्रमुख अल माजिद आणि आदित्य भार्गव आदींचा समावेश होता.
यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिकमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशीमुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळाचे आयुक्त युपीएस मदानसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणीएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे राधेश्याम मोपलवारमहाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे आदी उपस्थित होते.
            राज्यात सुरू असलेल्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गमेट्रोनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळस्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती तसेच यासाठी राज्य शासन करत असलेले प्रयत्नगुंतवणूकीच्या विविध संधी आदींची माहिती यावेळी अबुधाबीच्या शिष्टमंडळास देण्यात आली.
            राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामाबद्दल व येथे गुंतवणूक करण्याबद्दल सकारात्मक विचार करणार असल्याचे श्री. धाहेरी यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. राज्यात गुंतवणूक यावी,यासाठी राज्य शासनाने उद्योगस्नेही धोरणाबरोबरच इज ऑफ डुइंग बिझनेससारखी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात देशात झालेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीतील पन्नास टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्याच्या विकासात्मक दृष्टिकोनावर उद्योगांनी दाखविलेला हा विश्वास आहे. त्यामुळे केंद्र शासनानेही महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे.
            राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. स्मार्ट सिटीमेट्रोनवी मुंबई विमानतळ,नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे आदी सारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू आहेत. येत्या चार ते पाच वर्षात राज्यात आखणी मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणुकीची हीच योग्य वेळ असून अबुधाबीने येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी राज्य शासन व अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांचे एक संयुक्त कार्य समिती स्थापन करावीअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment