Saturday, March 4, 2017

संरक्षण आणि हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्राचे स्वतंत्र धोरण


३३ हजार कोटींची गुंतवणूक व १ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबईदि. 4 : महाराष्ट्रात संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीस चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. असे धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. या माध्यमातून ५ बिलियन डॉलर (सुमारे ३३ हजार ५०० कोटी रुपये) गुंतवणूक होणार असून १ लाख रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहेअशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
हॉटेल ट्रायडेंट येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने डिफेन्स अँड एरोस्पेस मेक विथ महाराष्ट्र या विषयावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत परिषद झाली. त्याविषयी माहिती देण्यासाठी हॉटेल ट्रायडेंट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले कीमेक इंडिया मोहिमेंतर्गत संरक्षण क्षेत्रातील जागतिक कंपन्या भारतात गुंतवणूक करू पाहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात देखील संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील जागतिक कंपन्यांनी गुंतवणूक करावी. यासाठी आज झालेल्या परिषदेत राज्याने तयार केलेले स्वतंत्र धोरण जागतिक कंपन्यांसमोर मांडण्यात आले. त्याचे स्वागत करण्यात आले असून काही सूचना या कंपन्यांमार्फत करण्यात आल्या असून त्याचा समावेश धोरणात करण्यात येईल.
या धोरणानुसार महाराष्ट्रात संरक्षण आणि हवाई उत्पादक क्षेत्रातील कंपन्यांकडून सुमारे ५ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल. त्यामुळे १ लाख रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
                राज्य शासन उभारणार 1 हजार कोटी रुपयांचा फंड
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले कीया क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांची गरज लक्षात घेऊन धोरण तयार करण्यात आले आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना सहाय्य म्हणून राज्य शासन १ हजार कोटी रुपयांचा फंड उभारणार आहे. त्याशिवाय अन्य सवलती देखील या कंपन्यांना देण्यात येतील.
राज्यात पुणेअहमदनगरऔरंगाबादनाशिकनागपूर येथे संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीस वाव आहे. संरक्षण क्षेत्रातील २५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योग गुंतवणूकीसाठी संधी आहे. आज झालेल्या परिषदेमध्ये जागतिक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीस सकारात्मकता दर्शवली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            संरक्षण उत्पादन कंपन्यांकडून महाराष्ट्राला प्राधान्य : संरक्षण मंत्री
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संरक्षण क्षेत्रातील उत्पादक कंपन्या महाराष्ट्राला प्राधान्य देतात, असे संरक्षण मंत्री श्री. पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेसंरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव सुरिन रंजनराज्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र उपस्थित होते.
०००००

No comments:

Post a Comment