Tuesday, September 19, 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेस 22 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे आवाहन


पुणेदि. 18 : राज्यातील सततच्या दुष्काळी व नापिकीच्या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 जाहीर केली आहेया योजनेला 22 सप्टेंबर 2017 पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहेपुणे जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत,त्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर किंवा  आपले सरकार’ या संकेत स्थळावर आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने  भरुन घ्यावेत,असे आवाहन  जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे जिल्हास्तरीय अंमलबजावणी व नियंत्रण समितीच्या बैठकी दरम्यान केले.
 योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेतत्यानुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाउपविभाग व  तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहेपुणे जिल्हा स्तरावरील जिल्हा स्तरीय अंमलबजावणी व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलीयावेळी लाभार्थी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रगती व योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा श्रीराव यांनी घेतला.
या  योजने अंतर्गत लाभार्थ्यांची माहितीवित्तीय संस्थांनी आपले सरकार पोर्टलवर तात्काळ भरावयाची आहेराष्ट्रियीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले खाते असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेमध्ये व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाभार्थी अर्जदारांनी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामध्ये आपल्या  आधार कार्डाची छायांकित प्रत त्वरीत सादर करावीअसेही आवाहन श्री राव यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment