पुणे दि.21 : - वंदेभारत या मिशनअंतर्गत चवथ्या टप्प्याची सुरुवात 4 जुलै 2020 पासुन सुरु झाली आहे. पुणे विभागामध्ये 21 जुलै 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून 457, दुस-या टप्प्यामध्ये 789 त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यामध्ये 2 हजार 297, चवथ्या टप्प्यामध्ये 1 हजार 765 अशा एकूण 5 हजार 308 व्यक्तींचे परदेशातून आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 4 हजार 346 सातारा जिल्हयातील 257, सांगली जिल्हयातील 218, सोलापूर जिल्हयातील 256 तर कोल्हापूर जिल्हयातील 231 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0 0 0 0
No comments:
Post a Comment