Friday, January 27, 2017

कृषी विषयक योजनांना पतपुरवठा करा - जिल्हाधिकारी



सोलापूर दि. 27 – राज्य शासन शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कृषी विषयक योजना राबविते. या योजनेंतर्गत संबंधित बँकांनी शेतक-यांना वेळेवर व पूरक आर्थिक मदत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी दिले.
खरीप – रब्बी हंगामातर्गंत पीक विमा योजनेच्या संदर्भात समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रणजीतकुमार म्हणाले , ‘ सध्या बँकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र याही परिस्थितीत बँकांनी शेतक-यांच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने कार्यप्रणाली राबवावी .’
सन 2016 -17 या वर्षाकरिता संबंधित बँक अधिका-यांनी पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतक-यांची संपूर्ण यादी त्याचबरोबर पीक निहाय यादी agri_insurance वेबपोर्टलवर सादर करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सन 2015 – 16 या वर्षामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार शेतक-यांना इन्शुरन्स कंपन्याकडून सुमारे 67 कोटी 72 लाख रूपये रब्बी हंगाम पीक विमा पोटी मंजूर झाल्याची माहिती दिली.
तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर झालेले 134 प्रस्ताव, खादी बोर्डाचे 77 तर खादी कमिशनचे 242 प्रस्ताव संबंधित बँकांनी मंजूर केले नसल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बाळासाहेब यशवंते यांनी दिली.या बैठकीसाठी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
***********

No comments:

Post a Comment