सोलापूर दि. 02 :- राज्य शासनाच्या महिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता तसेच पत्रकारितेच्या अनुषंगाने वृत्तकथा, छायाचित्र, उत्कृष्ट दुरचित्रवाणी, सोशल मिडीया तसेच स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती आदी पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांनी दिनांक 1 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत बातम्या, लेख, यशकथा, वृत्त चित्रकथा, सोशल मिडीया आदी संदर्भात लिखाण केलेले असावे. हे लिखाण संबंधित जिल्हा माहिती कार्यालयात दिनांक 31 जानेवारी 2017 पर्यंत पाठवावे. मुदती नंतर आलेल्या प्रवेशिकांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
या पुरस्काराबाबत अर्जाचे नमुने तसेच माहितीपत्रक www.maharashtra.gov.in, dgipr.maharashtra.gov.in तसेच mahanews.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याबरोबर संबंधितांना जिल्हा माहिती कार्यालयातही प्रवेशिकेचा नमुना मिळू शकेल.
या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी, छायाचित्रकारांनी तसेच लिखाणाच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर त्याचबरोबर स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पर लिखाण करणाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment