पुणे दि. ०२ : पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात रब्बी हंगाम २०१६-१७ मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०१६-१७ करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी सहभागाची अंतिम मुदत दि. १० जानेवारी २०१७ अशी करण्यात आल्याची माहिती कृषि उपसंचालक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात रब्बी हंगाम २०१६-१७ मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०१६-१७ करिता ज्या पिकांकरिता मुदत दि. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत होती त्याच पिकांसाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे. दि. १० जानेवारी २०१७ पर्यंत ही अंतिम मुदत वाढ करण्यात आली आहे.
या योजनेच्या अधिकमाहितीसाठी नॅशलन इन्शुरन्स कंपनी लिमीटेड यांचे जिल्हानिहाय प्रतिनिधी तसेच संबंधित विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा.या योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
००००००
No comments:
Post a Comment