Wednesday, January 25, 2017

निर्भिडपणे मतदान करुन विकासाचे दूत व्हा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांची तरुणाईला साद





सोलापूर दि.25 :- युवकांना निर्भिडपणे मतदान करुन  विकासाचे दूत व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी आज तरुणाईला केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी रणजीतकुमार बोलत होते.  येथील श्री शिवछत्रपती रंगभवन येथे झालेल्या या कार्यक्‌रमास सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन.मालदार, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, महापालिकेचे आयुक्त विजय काळम – पाटील, पोलीस अधिक्षक एस. वीरेश प्रभू आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रणजीतकुमार म्हणाले, आपल्या लोकसंख्येत तरुणांचा वाटा मोठा आहे.            तरुण – तरुणी यांनी निर्भिडपणे मतदान करुन विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे. तरुणाईत सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद आहे. त्याचा वापर करुन तरुणांनी बदलाचे दूत व्हायला हवे.
मतदान घटनेने दिलेला अतिशय पवित्र हक्क आहे. या हक्काचा वापर सकारात्मक पध्दतीने करुन तरुणांनी भारतील लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले.
पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर म्हणाले, युवकांच्या शक्तीचा वापर मतदानासाठी झाला तर देशात चांगले सरकार निर्माण होईल. यासाठी युवकांनी मतदान करावे. भावी मतदाराने आपल्या नावाची नोंद करण्याबरोबरच मतदान जागृतीसाठी पुढे यावे.
जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मतदान दिनानिमित्त आयाजित केलेल्या रॅलीत शहरातील शाळा, महाविद्यालयातील युवकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविल्याबद्दल महापालिका आयुक्त विजय काळम पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थित युवकांना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी मतदार दिनाची शपथ दिली.
या कार्यक्रमात मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, शिवाजी जगताप, शिक्षण सह संचालक सुनिल देशपांडे आदी उपस्थित होते.

*****






No comments:

Post a Comment