पुणे, दि. 23 - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर व आसाम,ओरीसा या राज्यामधील 1 लाख 58 हजार 81 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 23 मे 2020 अखेर 118 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 56, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 24 , हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 5, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरासाठी 1, आसामसाठी 1,ओरीसासाठी 1 अशा एकूण 118 रेल्वेगाडया 1 लाख 58 हजार 81 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment