पुणे, दि. 26 - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 1 लाख 88 हजार 570 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 26 मे 2020 अखेर 141 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 61, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 35, हिमाचल प्रदेशसाठी 1 , झारखंडसाठी 6, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओरीसासाठी 2 व पश्चिम बंगालसाठी 4 अशा एकूण 141 रेल्वेगाडया 1 लाख 88 हजार 570 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment