Friday, October 5, 2018

कौशल्य विकासाचा लाभ विणकरांनी घ्यावा - राज्यपाल चे. विद्यासागर राव



पुणे दि.: हजारो वर्षांची वस्त्रोद्योगाची परंपरा असलेल्या विणकरांनी बदलत्या परिस्थितीत शासनाच्या  उद्योगाच्या सोयीसवलती आणि विविध योजना तसेच कौशल्य विकासाच्या संधीचा फायदा  घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
पद्मशाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेचा चरखा चालवून शुभारंभ आणि संस्थेच्या  संकेतस्थळाचे विमोचन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांचा स्मृतिचिन्हपुणेरी पगडीशालपुष्पगुच्छ देऊन संस्थेचे विश्वस्त वसंत येमुल आणि हरीश केंची यांनी केले.
'जेव्हा जगभर वस्त्र वापरले जात नव्हे तेव्हा भारतातील लोक कापसापासून सूत आणि सुतापासून वस्त्रनिर्मिती करत होते.असं सांगून राज्यपाल म्हणाले, 'जनावरांच्या अंगावरील लोकर काढून त्याची वस्त्रनिर्मिती करणारे ब्रिटिश राज्यकर्ते भारतात आल्यानंतरझाडावर उगवणारा कापूस आणि त्यातून केली जाणारी वस्त्रनिर्मिती पाहून अचंबित झाले आणि त्यांनी तो कापूस इंग्लंडमध्ये नेऊन तिथे कापड तयार केले आणि ते  जगात विकून प्रचंड पैसा कमावलाआपल्याला मात्र हे कधी कळलेच नाही. मात्र भारत ही सुवर्णभूमी आहे हे वस्त्रोद्योगातून ब्रिटिशांना कळले होते.
ते पुढे म्हणालेवस्त्रोद्योगात असलेल्या पद्मशाली समाजाने बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा आणि जागतिकीकरणाचा विचार करून आपल्या व्यवसायात बदल केला पाहिजे.  त्याचबरोबर नव्या पिढीने या बदलती आव्हाने स्वीकारून विविध क्षेत्रात वाटचाल करायला हवी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष राहुल येमुलश्रीकांत कुंदेनवसंत येमुलअशोक इप्पा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.  सूत्रसंचालन मृणाल केंची यांनी केले. यावेळी पद्मशाली विणकर समाजातील उद्योजक उपस्थित होते.









No comments:

Post a Comment