नागपूर, दि. 7 : वीटभट्टीधारकांनी
पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 अंतर्भूत वने व पर्यावरण विभाग भारत सरकार यांनी
पारित केलेल्या राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांच्या अटींचे पालन करणे बंधनकारक
असल्याची माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
पालघर जिल्ह्यातील वीटभट्ट्यांभोवती
चिमणी उभारण्याबाबतचा प्रश्न आमदार विलास तरे यांनी विचारला होता. या प्रश्नाला
उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी
बोलताना श्री. पोटे-पाटील म्हणाले की, शासनाने महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण
मंडळामार्फत निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक
विटभट्टया स्थाननिश्चिती व उद्योग उभारणी नियम, 2016 प्रसारित केले आहेत. सदर अधिसूचनेच्या
नियमानुसार, जे विटभट्टीधारक 9X4X6 इंच
आकाराच्या एकावेळी 25 हजार नगांपेक्षा जास्त विटांची निर्मिती करीत असतील, तसेच 9X4X3 इंच आकाराच्या एकावेळी 50 हजार नगांपेक्षा जास्त विटांची निर्मिती करीत
असतील, अशा विटभट्याधारकांनी म.प्र.नि.मंडळाचे संमतीपत्र घेणे बंधनकारक राहील.
तथापि यापेक्षा कमी उत्पादन असल्यास संमतीपत्राची आवश्यकता नाही. सदरचा निर्णय हा
राखेचे प्रदुषण रोखणे स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासाठी घेण्यात आल्याचेही
श्री.पोटे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
000
No comments:
Post a Comment