Saturday, September 29, 2018

सैनिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन


सोलापूर दि. 29 :- सैनिक देशसेवेचे कर्तव्य बाजावण्यासाठी आपल्या कुटूंबापासून लांब राहतो, त्यामुळे गावाकडील शासकीय कार्यालयातील त्याची कामे प्रलंबित राहतात. देशसेवा बजावणऱ्या सैनिकांच्या व माजी सैनिकांच्या समस्या, प्रकरणे सोडविण्यास शासकीय विभागानी प्राधान्य द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात शौर्य दिनानिमित कार्यक्रमात जिल्ह्यातील शहीद जवानांचे कुटुंबिय, माजी सैनिक, विधवा पत्नी यांना  गौरविण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक मनोज पाटील, पोलीस उपायुक्त शशिकांत महानवर, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, म्हाडाचे अपर जिल्हाधिकारी अशोक पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कर्नल अनिल भोसले, अशोक कुमार, मेजर निवृत्त      श्री. खांडेकर उपस्थित होते.
            डॉ. भोसले म्हणाले, ‘सेवारत सैनिक व माजी सेनिकांची बहुतांशी जमिनी विषयक प्रकरणे प्रलंबित असतात. नियमानुसार ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी त्या त्या विभागांनी  प्राधान्य द्यावे’.
            कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, शहिद जवानांचे कुटंबिय, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 *******


No comments:

Post a Comment