सोलापूर दि.04 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत शहरातील अ.ब.क.ड या चार परिमंडळासाठी अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थीसाठी नोव्हेंबर महिन्याकरीता गहू व तांदूळ नियतन मंजूर झाले आहे.
अंत्योदय अन्न योजनेंतर्गत प्रतिकार्ड सुमारे 21 किलो गहू,14 किलो तांदूळ याप्रमाणे एकूण 35 किलो तर प्राधान्य कुटूंब लाभार्थींसाठी प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे एकूण 5 किलो धान्य वितरीत करण्यात येते.
अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शहरातील नागरिकांसाठी 1477.55 क्विंटल गहू व 977.16 क्विंटल इतका तांदूळ मंजूर झाला आहे तर प्राधान्य कुटूंब लाभार्थींसाठी 12683.38 क्विंटल गहू आणि 8448.30 क्विंटल तांदूळ या चारही परिमंडळासाठी मंजूर झाले आहे. मंजूर झालेले हे धान्य संबंधित लाभार्थ्यांनाच मिळेल याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment