सातारा, दि.23
(जिमाका) : कास
पुष्प पठारावरील पर्यटकांच्या गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी व नैसर्गिक जागतिक
वारसा स्थळाचे कास पुष्प पठाराचे संरक्षणासाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत
प्रत्येकी तीन तासाला 750 या प्रमाणे प्रतिदिन 3 हजार पर्यटकांना कास पठारावरील
दृष्यके पाहण्यासाठी प्रवेश मर्यादा घालण्यात आलेली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक
अनिल अंजनकर यांनी दिली आहे.
26 ऑगस्ट पासून कास पुष्प पठार पर्यटन हंगाम सुरु करण्यात
आलेला आहे. पर्यटकांसाठी www.kas.ind.in
या संकेतस्थळावर वन विभागामार्फत बुकींगची सुविधा करण्यात आलेली
आहे. कास पठारावर सर्व पुष्पप्रजातींना फुले आली असून ती पाहण्यासाठी बहुतांश
पर्यटक हे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी येतात. त्यामुळे कास पठरावर मोठ्या प्रमाणात
गर्दी होते. कास पुष्प पठार येथे सध्या पाऊस पडत असल्याने पर्यटकांची गैरसोय
होण्याची शक्यता आहे. कास पठारावर होणारी गर्दी व वाहतूक कोंडी व वेळेचा अपव्यय
टाळण्यासाठी मुंबई, पुणे व स्थानिक पर्यटकांनी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कास
पुष्प पठाराला भेट द्यावी, असे आवाहनही श्री. अंजनकर यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment