Tuesday, September 20, 2016

मयताची पत्नी सरिता रविंद्र जाधव यांना 4 लाख रुपयांची मदत


                सातारा, दि. 20 (जिमाका) दिनांक 3 ऑगस्ट 2016 रोजी मौजे गोवे ते लिंब ता.सातारा दरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या पुलावर अचानक पाणी वाढल्याने रविंद्र भरत जाधव वय-36 वर्षे रा.गोवे ता.जि.सातारा हे पुराच्या पाण्यात बुडुन मयत झाले होते. त्यांना महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्र.सीएलएस-2015/प्र.क्र.40/म-3 मंत्रालय मुंबई दिनांक 13 मे 2015 अन्वये शासकीय मदत म्हणून 4 लाख रुपयांची मदत जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार सातारा यांनी तातडीने कार्यवाही करुन 4 लाख रुपयांचा धनादेश मंजूर करण्यात आला होता. धनादेश मयताची पत्नी सरिता रविंद्र जाधव यांना दि.6 सप्टेंबर 2016 रोजी उपविभागीय अधिकारी  अमृत नाटेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी तहसीलदार निलप्रसाद चव्हाण हे उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment