Thursday, September 29, 2016

अनपटवाडीतील जलक्रांती


कोरेगाव तालुक्यातील अवघ्या 1 हजार 785 लोकसंख्येचं गाव अनपटवाडी ! गाव एकत्र आल्यानंतर कशाप्रकारे जलक्रांती साकारली जाते याचे उत्तम उदाहरण अनपटवाडीकरांनी दाखवून दिले आहे. सत्यमेव जयेते वॉटरकप स्पर्धेत या गावाने 10 लाख रुपयांचे बक्षिस मिळवून अन्य गावांसाठी प्रेरणा दिली आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांपासून जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत गावासाठी टँकर लागायचे. परंतु जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गाव एकत्र झाला आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे करुन भूईवर पडणारा प्रत्येक थेंब या माध्यमातून अडविला. सध्या झालेल्या पावसामुळे गावात जलक्रांती झालेली दिसून येत आहे. तलाव ओसंडून वाहू लागला आहे.

  गावात झालेली कामे :

1
सिमेंट साखळी बंधारा
5
2
सिमेंट बंधारा दुरुस्ती
2
3
नाला खोलीकरण
6
4
माती नालाबांध दुरुस्ती
1
5
गॅबियन स्ट्रक्चर
3
6
ठिबक/तुषार सिंचन
25 हे.
7
सिमेंट साखळी बंधारा
2
8
पाझर तलाव गाळ काढणे
1

नाविन्यर्ण कामे
1)       लोकसहभागातून सिमेंट/माती नालाबांधातून काढलेल्या गाळातून 5 शेतक-यांनी आले पिकाची लागवड करण्यात आली असुन .त्यातुन शेतक-यांना चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.
2)       चालु वर्षी गावामध्ये 20.00 एकर क्षेञावर कांदा बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम कृषी विभागाच्या सहकार्याने घेण्यात आला होता. कांदा बियाणे विक्रीतुन अंदाजे शेतक-यांना 15 ते 16 लाख चे एकुण उत्पन्न झाले आहे.
कामाचे दृष्य अदृष्य परिणाम
1)       पाण्याचे दरडोई उपलब्धता - झालेल्या कामातुन 263.71 टीसीएम पाण्याची उपलब्धता झालेली आहे.त्यामुळे सध्या 91573 लिटर प्रति वर्षी दरडोई पाण्याची उपलब्धता झाली आहे.
मागील दोन वर्षापर्यंत गावामध्ये नोंव्हेबर महिन्यात टँकरची गरज भासत असे परंतु मागिल वर्षी 120.00 मिमी इतका कमी पाऊस पडुन सुध्दा 15 एप्रिल 2016 पर्यंत टँकरची गरज भासली नाही. तसेच मे 2016 महिन्यात गावामधील 2 कुपनलिका घेतले असता 2.00 इंची पाणी भरपुर प्रमाणात लागले.
वैरण विकास कार्यक्रमांतर्गत 40 एकरावर मका हिरवा चारा उत्पादन केलेमुळे चारा टंचाई जाणवली नाही.
2)    विहीर पाण्याची पातळी
सरासरी पुर्वीची पाण्याची पातळी 15.00 मीटर होती.
सध्याची सरासरी प्रकल्पानंतर पाण्याची पातळी 9.00 मीटर आहे.

1.             पीक उत्पादकता मध्ये झालेली वाढ.
               प्रकल्प पूर्व                  - ज्वारी – 950 कि/हे, घेवडा – 920 कि/हे  
         प्रकल्प नंतर(अपेक्षित)                  - ज्वारी – 1350 कि/हे , घेवडा – 1130 कि/हे  
2.             वर्षाच्या एकूण कालावधीत पाण्याच्या उपलब्धतेतून/ पातळीत झालेली वाढ -                       
                                                 प्रकल्प पूर्वी सहा महिने उपलब्धता
                                                                                प्रकल्पानंतर (अपेक्षीत) - 12 महिने उपलब्धता
3. पाणलोट विकासाच्या कामामुळे शेती विकासाच्या शेती उत्पादकतेत व शेती पुरक व्यवसायात   
        झालेली वाढ                                      – 5 टक्के
4.   रोजगारासाठी स्थलांतराचे कमी झालेले प्रमाणदहा टक्के
5.    सरंक्षित सिंचन क्षेञातील वाढ                                     – 90.00 हेक्टर
6.   वहितीखाली वाढलेले क्षेञ                          – 20.00 हेक्टर क्षेञ
7. ठिबक व तुषार सिंचन क्षेत्रात झालेली वाढ(अपेक्षित)वीस टक्के
मनोज अनपट (सरपंच)- गावाला एकसारखा टँकर असायचा 30 ते 40 कोटी लिटर वाहून जाणारे पाणी गावामध्ये अडविले आहे. शेतकरी वर्षातून दोन पिके घ्यायचा आता तीन पिके घेऊ शकतो. यापुढे 100 टक्के ठिबकवर शेती करायचा निर्णय झाला आहे.  जलसंधारणाची कामे करण्यासाठी शेतकऱ्यानी स्वत:हून 60 एकर जमीन गावाला दिली. चारकोपचे आमदार योगेश सागर आणि निलकमल कंपनी शरद पारिख यांनी मोठी मदत केली. त्याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केल्यामुळेच गावाने 10 लाखाचे बक्षिस मिळविले, अशी भावना सरपंच मनोज अनपट यांनी बोलून दाखवली. 
नंदकुमार कदम (ग्रामस्थ)- ग्रामस्थांच्या श्रमशक्तीपुढे जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे गावात चार पटीने पाणीसाठा वाढला आहे.
ज्ञानोबा अनपट (शेतकरी)- गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे, नालाबंडींगमुळे विहिरीला भरपूर पाणी वाढले आहे.
भरत मुळीक (ग्रामस्थ)- दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात सीसीटी, डीप सीसीटी, तलाव रुंदीकरण, खोलीकरण आदी कामे झाल्याने गावामध्ये मोठया प्रमाणात पाणीसाठा दिसतोय. गावाची पाणी समस्या मिटली आहे.
सुलोचना अनपट (शेतकरी)- गावात जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. आता वर्षातून तीन पिके घेता येतील.
ग्रामस्थांची श्रमशक्ती एकत्रीत आल्यानंतर गावात जलक्रांती होऊ शकते याचे उत्तम उदाहरण अनपटवाडीकरांनी  या निमित्ताने दाखवून दिले आहे. त्याचे फळही त्यांना सत्यमेव जयते वॉटरकपच्या माध्यमातून 10 लाखाचे बक्षीसाने मिळाले आहे.


                                             -   प्रशांत सातपुते
                                                                                                                          जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
00000





No comments:

Post a Comment