सातारा, दि. 17 (जिमाका) : सातारा लोणंद रस्त्यावरील कि.मी.18/200 मधील आरळे येथील ब्रिटीश कालीन पुलाच्या सातारा बाजूस असलेल्या पोहच मार्गावर भगदड पडलेले आहे. त्या प्रमाणे पुलाच्या दुस-या म्हणजे वडूथ बाजूकडील जोड रस्त्याचा भराव खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे या रस्त्यावरील सर्व हालकी तसेच मल्टी एक्सल वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन व वाहतूक सुरक्षितता विचारात घेऊन या मार्गावरील सर्व हालकी वाहने तसेच जड वाहने, बसेस,ट्रक्स व मल्टी एक्सल वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सातारा लोणंद जळगाव पळशी रेल्वे गेट ते आंबवडे चौक मार्गे लोणंद या पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment