सातारा, दि.21
(जिमाका) : ज्या शेतक-यांनी माहे जुलै व ऑगस्ट 2016
मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेली आहे, अशा शेतक-यांना
प्रति क्विंटल रु.100 प्रमाणे जास्तीत जास्त 200 क्विंटल करीता अनुदान देण्याचा
प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातारा
जिल्हयातील या दोन महिन्यात बाजार समिती आवारामध्ये कांदा विक्री केलेल्या उत्पादक
शेतक-यांनी बाजार समितीमध्ये विक्री पट्टीसह, 7/12 चा उतारा, आपले बचत खाते पासबुकच्या
पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत इत्यादीसह दिनांक 23 सप्टेंबर 2016 पर्यंत बाजार
समितीकडे अर्ज करावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक महेश कदम यांनी
केले आहे.
0000
No comments:
Post a Comment