सातारा, दि. 28 (जिमाका) : युवकांना उद्योग उभारणीसाठी विविध बँकांनी
पंतप्रधान मुद्रा योजनेतून अर्थ सहाय्य
करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांनी आज केले.
सल्लागार
समितीची बैठक आज येथील नियोजन भवनात
घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव,
बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक
महादेव शिरोळकर, आयडीबीआय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अनिल गोडबोले, नाबार्डचे जिल्हा उप प्रबंधक सुबोध अभ्यंकर, आर. बी.आयचे हेमंत दंडवते, ग्रामीण विकास
यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन.एल. थाडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी
यावेळी उपस्थित होते.
युवकांना
रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना अत्यंत महत्वाची आहे,
असे सांगून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नरळे पुढे म्हणाले, समाजातील योग्य लोकांना
या योजनेचा लाभ द्यावा. या योजनेमुळे समाजावर तसेच अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम
होणार आहे. तरी बँकांनी मुद्रा योजनेचे जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करुन आपले
उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
यावेळी
डॉ. राजेश देशमुख म्हणाले, बँकांनी व विविध महामंडळांनी आपापसात
समन्वय ठेवून काम करावे. शासनाच्या विविध विभागांकडून येणाऱ्या अर्थ सहाय्याची
प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत. मार्च महिन्याची वाट न पाहता देण्यात आलेले
उद्दिष्ट हे आपले स्वत:चे उद्दिष्ट समजून विविध शासकीय विभागांकडून येणारी कर्ज
प्रकरणे तात्काळ निकाली काढावे, असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी
अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव म्हणाले, पंतप्रधान मुद्रा योजनेची माहिती
तहसीलदारांना द्यावी. त्यांच्यामार्फत या योजनेची माहिती तलाठ्यांपर्यंत पोहचविली जाईल.
पंतप्रधान मुद्रा योजनेचे काही बँकांनी चांगले काम केले आहे तर काही बँकांनी
चांगले काम केलेले नाही. छोटे-छोटे उद्योग सुरु करण्यासाठी बँकांनी अर्थ सहाय्य करावे . यामुळे मोठ्या
प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. प्रत्येक समाजासाठी विविध महामंडळे आहेत.
लाभार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी या महामंडळाच्या योजनांचाही लाभ द्यावा, असे
आवाहनही त्यांनी शेवटी केले.
या
बैठकीमध्ये जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी मुद्रा योजनेसाठी गठीत
करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांची माहिती व समितीमार्फत करण्यात येणाऱ्या
कामकाजाची माहिती दिली.
या
बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
युवक- युवतींना स्वयंरोजगारासाठी मुद्रा योजनेतून बँकांनी अर्थ सहाय्य करावे
- अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव
सातारा, दि. 28 (जिमाका) : आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण घेणाऱ्या बेरोजगार
युवक- युवतींना
स्वयंरोजगारासाठी मुद्रा योजनेतून बँकांनी अर्थ सहाय्य करावे, अशा सूचना अपर
जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी आज दिल्या.
डीएलआरएसीची
बैठक अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते
बोलत होते. या बैठकीला ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन.एल. थाडे,
आयडीबीआय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अनिल गोडबोले, सहायक क्षेत्रीय अलोक रंजन, आकाशवाणी
केंद्राचे संचालक इंद्रजित बागल, मीटकॉनचे प्रकल्प संचालक महेश कुलकर्णी,
प्रशिक्षक विजय आडसूळ, गीतांजली जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
आयडीबीआय
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने पर्यावरणाच्या दृष्टीने कागदी डीश, कागदी
ग्लास व पानाच्या पत्रावळ्या बनविण्याचे प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना करुन अपर
जिल्हाधिकारी श्री. यादव पुढे म्हणाले, शेळी पालन प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागातील
महिला मोठ्या संख्येने येत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सर्वेक्षण करुन
गावात महिलांना शेळीपालनाचे प्रशिक्षण द्यावे. तसेच आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार
प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना स्वत:चा उद्योग उभा केला
असेल तर त्याच्या यशकथा तयार कराव्यात व
त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी त्याचा इतर युवक व युवतींना फायदा होईल.
सध्या
बाजारात काय विकले जात आहे, लोकांना कोणत्या वस्तुंची गरज आहे, याचा अभ्यास करुन
आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने वर्ग तयार करुन बेरोजगार
युवकांना प्रशिक्षीत करावे. तसेच महिलांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत
प्रशिक्षण देऊन महिला सक्षमीकरणावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
00000
No comments:
Post a Comment