Saturday, October 15, 2016

रोजगार प्राप्तीसाठी युवकांनीसकारात्मकता बाळगावी...कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर


          
            पुणेदि. 15 :- युवकांचा विकास होण्यासाठी शासनातर्फे कौशल्य विकासाच्या विविध योजना व कार्यक्रम राबविण्यात येत आहे.रोजगारप्राप्तीसाठी युवकांनी सकारात्मकता अंगिकारावी असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
            कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व व्यवसाय प्रशिक्षण विभागाच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेया रोजगार मेळाव्यास उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर बोलत होतेयावेळी व्यासपिठावर आमदार योगेश टिळेकरव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळेउपसंचालक दिलीप पवार उपस्थित होते.
            यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले कीचालू शतकात भारत सर्वाधिक तरुण असलेला देश बनणार आहेतरुण व युवकांना रोजगार मिळावा यासाठी शासनातर्फे कौशल्य विकासाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.तरुणामध्ये कौशल्य विकास व्हावा यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानमेक इन इंडियाडिजीटल इंडिया उपक्रम राबविण्यात येत आहेतयुवकांमध्ये असलेल्या कौशल्याचा विकास करुन युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहेयुवक प्रशिक्षीत झाल्यामुळे त्यांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहेशासनातर्फे परदेशी कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात येत आहेयाचा फायदा तरुणांना होणार असल्याचे सांगून रोजगार मेळाव्यात नोंदणी झालेल्या सर्वांना रोजगाराची संधी मिळेल यासाठी आयोजकांनी प्रयत्न करावे अशी सूचना यावेळी मंत्रीमहोदयांनी केली.
            आमदार योगेश टिळेकर यांनी रोजगार मेळाव्याचा तरुणांनी फायदा घ्यावे असे आवाहन केलेयुवकांमधील कौशल्याचा विकास व्हावा व त्यांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
            व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी रोजगार मेळावा आयोजित करण्याचा उद्देश सांगितला.व्यावसायीक व कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्यावतीने भरती मेळावे व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येतातप्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेद्वारे युवकांना मोठया प्रमाणावर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहेयुवकांनी याचा लाभ घेऊन देशाला व राज्याला प्रगतीपथावर न्यावेमुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या मेक इन महाराष्ट्र योजनेमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहेत्यासाठी युवकांनी व्यावसायीक शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे ते म्हणाले.
            कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री महोदयांनी दिप प्रज्वलीत करुन केलेमहाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग सुरु करुन सहकाऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याबद्दल यशस्वी उद्योजकांचा यावेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाया मेळाव्यात सुमारे 26 उद्योजक सहभागी झाले होतेविविध कंपन्यांमध्ये सुमारे 896 पदांसाठी या रोजगार मेळाव्यात भरती करण्यात येणार आहेकार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थीविद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment