सोलापूर दि. 25 :- उद्योजकांनी अकृषक जमिनीचा वापर उद्योगासाठी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी केले. श्री. रेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक अकृषक जमीन वापर सहाय्यभूत समितीची बैठक झाली.
त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.
श्री रेळेकर म्हणाले, ‘नवीन उद्योजकास आवश्यक ती अधिकृत माहिती, विविध विभागामार्फत
तसेच संबंधित प्राधिकरणाकडून ‘एक खिडकी’ संरचनेतर्गत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी इच्छूकांना ना विकास विभागात सुध्दा अर्ज करता येतील’. बैठकीमध्ये करमाळा तालुक्यातील मौजे हिवरे येथील शामराव फरतडे यांच्या अर्जावर विचार विनिमय करण्यात आला.
या बैठकीसाठी महसूल तहसिलदार श्रीमती मिनल भामरे - मुळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी न.
स. अवताडे, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक रा. ना. हवळे, शहर एम.एस.ई.बी चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अर्जुन कांबळे, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अ. सि. शिंदे, जिल्हा परिषद ल. पा चे उप कार्यकारी अभियंता एम.के. मुल्ला, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरिक्षक एस.
डी. खंबायत यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment