Saturday, August 20, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिन साजरा


सातारा, दि. 20 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्‌भावना दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्‌भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
मी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनियम करुन व संविधानिक मार्गानी सोडवीन, अशी प्रतिज्ञा यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, तहसीलदार विवेक जाधव, जयश्री आव्हाड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.00000

No comments:

Post a Comment